शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

पक्के रस्ते व नाली बांधकामाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST

जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर माेहझरी गाव आहे. गावात २००च्या आसपास कुटुंब आहेत. या गावाचा समावेश नवरगाव गट ग्रामपंचायतमध्ये ...

जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर माेहझरी गाव आहे. गावात २००च्या आसपास कुटुंब आहेत. या गावाचा समावेश नवरगाव गट ग्रामपंचायतमध्ये हाेताे. गावात २० वर्षांपूर्वी अंतर्गत रस्ते व नालीचे बांधकाम करण्यात आले. काही वर्षांनंतर येथील रस्ता उखडण्यास सुरुवात झाली. वर्षानुवर्ष रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली. रस्त्याच्या दुतर्फा नालीचे बांधकाम करण्यात आले. परंतु तेसुद्धा अर्धवट स्थितीत आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आले नाही. सध्या नाल्या पूर्णत: बुजलेल्या आहेत. गटग्रामपंचायत प्रशासन गावात मूलभूत साेयीसुविधा पुरविण्याकडे तसेच गावातील विकास करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावात तीन हातपंप व दोन विहिरी आहेत. याच जलस्त्राेतांचे पाणी नागरिकांना प्यावे लागते. येथे नळयाेजना कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली; परंतु मागणीकडे दुर्लक्ष झाले. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून येथील रस्त्याचे नूतनीकरण करावे तसेच नालीचे बांधकाम नव्याने करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दीपाली लोमेश लांबाडे, नागरिक चंद्रभान महामंडरे, शाळा समिती उपाध्यक्ष लोमेश लांबाडे, शाळा समिती सदस्य मारोती मेश्राम, संदीप जुमनाके, कालिदास लांबाडे, करीम शेख, फिरोज शेख, शबिर शेख, रामदास महामंडरे, चंद्रकांत महामंडरे, धनपाल महामंडरे, गणेश महामंडरे, मंगेश मेश्राम, नीलकंठ मेश्राम आदी उपस्थित होते.

बाॅक्स

राेजगारासाठी स्थलांतर

माेहझरी येथे राेेेेजगाराचे साधन नसल्याने नागरिकांना राेजगारासाठी बाहेरगावी स्थलांतर करावे लागते. शासकीय याेजनांच्या लाभापासून गावातील नागरिक वंचित राहतात. येथील नागरिकांचा काैटुंबिक विकास अद्यापही झाला नाही. सध्या गावातील जवळपास ६० कुटुंबातील व्यक्ती मिरची ताेडणीसाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे गावात मूलभूत साेयीसुविधा पुरविण्यासह विकासात्मक कामे करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.