शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

१३२० हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 5:00 AM

धडक सिंचन विहीर, रोजगार हमी योजनेतून मिळणारी विहीर, शेततळे, कृषीपंप आदी छोट्या-मोठ्या सिंचन सुविधांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या चार, पाच वर्षात घेतला. जलयुक्त शिवार योजनेतूनही जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर अनेक शेतकºयांनी मोटारपंप लावून भाजीपाला पिकाची शेती फुलविली. त्यामुळे कोरोनाच्या संचारबंदीतही गडचिरोली जिल्हा मुख्यालयी व आरमोरी, चामोर्शी या तालुका मुख्यालयाच्या बाजारपेठेत गावठी भाजीपाल्याची कमतरता भासली नाही.

ठळक मुद्देउन्हाळी हंगाम : शासकीय योजनेतून सिंचन सुविधा निर्माण झाल्याने लागवडीचे क्षेत्र वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा धान शेतीसाठी प्रसिद्ध असला तरी गेल्या तीन, चार वर्षांपासून या जिल्ह्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. विशेष करून येथील शेतकरी रबी हंगामात अर्थात उन्हाळ्यामध्ये निघणाऱ्या भाजीपाला पिकाची लागवड करतात. सन २०१९-२० या चालू उन्हाळी हंगामात भामरागड व एटापल्ली हे दोन तालुके वगळता इतर दहा तालुक्यात एकूण १ हजार ३२०.७० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली.धडक सिंचन विहीर, रोजगार हमी योजनेतून मिळणारी विहीर, शेततळे, कृषीपंप आदी छोट्या-मोठ्या सिंचन सुविधांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या चार, पाच वर्षात घेतला. जलयुक्त शिवार योजनेतूनही जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर अनेक शेतकºयांनी मोटारपंप लावून भाजीपाला पिकाची शेती फुलविली. त्यामुळे कोरोनाच्या संचारबंदीतही गडचिरोली जिल्हा मुख्यालयी व आरमोरी, चामोर्शी या तालुका मुख्यालयाच्या बाजारपेठेत गावठी भाजीपाल्याची कमतरता भासली नाही.यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्हाभरात एकूण १५ हेक्टर क्षेत्रावर टरबूज पिकाची लागवड करण्यात आली. १२४.५० हेक्टरवर मिरची, २२५.६० हेक्टर क्षेत्रावर वांगी, १६३.१० हेक्टरवर कारले, १२९.१० हेक्टरवर टमाटर, ७.६० हेक्टर क्षेत्रावर पत्ता कोबी, ५८.२० हेक्टर क्षेत्रावर फुलकोबी, १०३.६० हेक्टरवर भेंडी तर ६६.६० हेक्टर क्षेत्रावर चवळी पिकाची लागवड करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यात पालेभाज्यांचेही उत्पादन बऱ्यापैकी होते. यंदाच्या उन्हाळी हंगामात पालक, मेथी, कोथिंबीर, आंबाडी, गव्हार आदी पिकाची लागवड करण्यात आली. २८ हेक्टरवर पालक, २ हेक्टरवर मेथी, २२.३५ हेक्टरवर कोथिंबीर पिकाची लागवड करण्यात आली. १३५ हेक्टर क्षेत्रावर गव्हार तसेच २२.५० हेक्टर क्षेत्रावर इतर पालेभाज्यांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात ६१. १० हेक्टर क्षेत्रावर कांदे पिकाची लागवड करण्यात आली आहे.अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानभामरागड व एटापल्ली तालुका वगळता इतर दहा तालुक्यात २०१९-२० वर्षातील उन्हाळी हंगामात बºयाच शेतकºयांनी भाजीपाला पिकाची लागवड केली. वैरागडसह ग्रामीण भागातील भाजीपाला कोरोना लॉकडाऊनच्या काळात गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी तालुका मुख्यालयी विक्रीसाठी आणला जात आहे. मात्र १० मे च्या पहाटेच्या सुमारास वादळी पाऊस बरसला. यापूर्वीसुद्धा तीन ते चार वेळा अधूनमधून पाऊस बरसला. पावसामुळे टमाटर पिकाचे नुकसान झाले. शिवाय कोथिंबीर, पालक, मेथी व इतर पालेभाज्या पिकांचे नुकसान झाले. आधीच संचारबंदीने भाजीपाला उत्पादक शेतकºयांना अल्प भाव मिळत आहे. त्यात पुन्हा पावसाने तडाखा दिला.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेती