शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

६४० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:09 IST

शेततळे, सिंचन विहीर व इतर स्वरूपातून गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. या सिंचन सुविधेच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता दुबार पिकांकडे आपला कल वाढविला आहे.

ठळक मुद्देउन्हाळी हंगाम : सर्वाधिक १३६ हेक्टर क्षेत्रावर वांग्याचे पीक बहरले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहीर व इतर स्वरूपातून गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. या सिंचन सुविधेच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता दुबार पिकांकडे आपला कल वाढविला आहे. सन २०१८-१९ या वर्षातील रबी हंगामात जिल्हाभरात एकूण ६४० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १३६ हेक्टर क्षेत्रावर वांग्याचे पीक बहरले आहे.गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, मुलचेरा व एटापल्ली हे तीन तालुके वगळता उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये शासन प्रशासनाच्या माध्यमातून काही प्रमाणात सिंचन सुविधा निर्माण झाल्या आहेत. तसेच काही प्रगतशील शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन सिंचन विहीर खोदली. त्यावर मोटारपंप बसवून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर जिल्ह्यातील अनेत शेतकरी आता खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात दुबार पिके घेत आहेत. गडचिरोली, कुरखेडा, आरमोरी व चार तालुक्यात मिळून रबी हंगामात २१ हेक्टर क्षेत्रावर टरबुजाची लागवड करण्यात आली. ८० हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक आरमोरी तालुक्यात ५८ हेक्टर इतके मिरची पिकाचे क्षेत्र आहे.१३६ हेक्टर क्षेत्रावर वांगी पिकाची लागवड करण्यात आली. आरमोरी तालुक्यात ६९ हेक्टर, त्याखालोखाल देसाईगंज व गडचिरोली तालुक्याचा क्रमांक लागतो. ७७ हेक्टर क्षेत्रावर कारले, तर ८६ हेक्टर क्षेत्रावर टमाटर पिकाची लागवड करण्यात आली.६० हेक्टर क्षेत्रावर पताकोबी व २४ हेक्टर क्षेत्रावर फुलकोबी पिकाची लागवड करण्यात आली. नऊ हेक्टर क्षेत्रावर कोथिंबीर तर २० हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक घेतले जात आहे. एकूण ५३ हेक्टर क्षेत्रावर इतर प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेतले जात आहे. दुबार पिकामुळे शेतकरी प्रगतीवर आहेत.आरमोरी तालुका आघाडीवरआरमोरी तालुक्याच्या वैरागड, वासाळा, वनखी, भाकरोंडी व इतर परिसरात सिंचनाच्या सुविधा शेतकºयांनी निर्माण केल्यामुळे या भागात दोन्ही हंगामात पिके घेतली जात आहेत. यंदाच्या रबी हंगामात आरमोरी तालुक्यात सर्वाधिक २७१ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये मिरची, वांगी, कारले, टमाटर, फुलकोबी, भेंडी आदींचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यानंतर देसाईगंज व त्याखालोखाल गडचिरोली व कुरखेडा तालुक्याचा भाजीपाला पिकाचा क्रमांक लागतो.६१ हेक्टरवर भेंडीचे पीक, सिरोंचा तालुक्यातही लागवडनागरिकांकडून भेंडीच्या भाजीला अधिक पसंती आहे. त्यामुळे दरवर्षीच्या उन्हाळ्यात भेंडी खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणच्या बाजारात नागरिक गर्दी करतात. यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्याच्या सात तालुक्यातील एकूण ६१ हेक्टर क्षेत्रावर भेंडी पिकाची लागवड करण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यात १४ हेक्टर, आरमोरी तालुक्यात २४ हेक्टर, चामोर्शी ६ हेक्टर, सिरोंचा १२ हेक्टर, देसाईगंज ३ हेक्टर, अहेरी तसेच कोरची तालुक्यात एक हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

टॅग्स :vegetableभाज्या