शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

४४ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

कीटकनाशके व रासायनिक खतांच्या वापरामुळे खरी हरितक्रांती निर्माण झाली. कीटकनाशके व रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. मात्र कीटकनाशके व रासायनिक खतांच्या अतीवापरामुळे अल्पावधीतच त्याचे दुष्परिणामही दिसून यायला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असा सल्ला विविध विभागाच्या तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

ठळक मुद्देसेंद्रीय शेतीकडे पाठ : जनजागृतीनंतरही अपेक्षित परिणाम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंंद्रिय खत वापरावे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असले तरी रासायनिक खतांचा वापर कमी झाला नसून दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी सुमारे ४४ हजार १२ मेट्रिक टन खतांची विक्री झाली आहे.कीटकनाशके व रासायनिक खतांच्या वापरामुळे खरी हरितक्रांती निर्माण झाली. कीटकनाशके व रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. मात्र कीटकनाशके व रासायनिक खतांच्या अतीवापरामुळे अल्पावधीतच त्याचे दुष्परिणामही दिसून यायला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असा सल्ला विविध विभागाच्या तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मात्र शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करीत असल्याचे रासायनिक खतांच्या विक्रीवरून दिसून येते.रासायनिक खतांमध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एसएसपी, एमओपी, मिश्रखते, संयुक्त खते यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात विक्री होणाºया खतांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास युरिया व संयुक्त खतांची सर्वाधिक विक्री केली जात असल्याचे दिसून येते.युरिया खतासाठी केंद्र शासन मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने हे खत सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग या खताची मागणी करतात. परिणामी कधीकधी या खताचा तुटवडा सुद्धा निर्माण होतो. एक महिन्यापूर्वी युरियाची मागणी अचानक वाढली होती. परिणामी तुटवडा निर्माण झाला होता. यावर्षीच्या खरीप हंगामात १४ हजार ९२० मेट्रिक टन विक्री झाली आहे. त्यानंतर संयुक्त खताचा क्रमांक लागतो.सुमारे १३ हजार ३१६ मेट्रिक टन संयुक्त खतांची विक्री झाली आहे. रासायनिक खतांचा वाढता वापर भविष्यासाठी धोक्याची घंटा असली तरी त्याचा वापर सर्वच शेतकरी करीत आहेत. सेंद्रीय शेतमाल चांगला असला तरी त्याला किंमत मिळत नसल्याने शेती परवडत नाही.सेंद्रीय शेती परवडत नसल्याचा अनुभवरासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होते. मात्र अतिप्रमाणात यांचा वापर झाल्यास त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होतात. तसेच जमीन, पाणी, हवेचे प्रदूषण होते. त्यामुळे रासायनिक खते व कीटकनाशकांचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन कृषी विभाग व इतर संस्थांमार्फत केले जाते. रासायनिक खते व कीटकनाशकांऐवजी सेंद्रीय खते व कीटकनाशकांचा वापर करावा, असे आवाहन केले जाते. शेतीत वाढत चाललेला यंत्राचा वापर यामुळे पशुधन घटले आहे. परिणामी सेंद्रीय खत तयार करणे बंद झाले आहे. तसेच सेंद्रीय पद्धतीने बनविलेल्या कीटकनाशकांना कीटक मानत नाही. परिणामी शेतकरी रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत.सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाचा दर्जा चांगला राहतो. वेळप्रसंगी सेंद्रीय शेतीचा उत्पादन खर्चही वाढतो. त्यामुळे सेंद्रीय मालाला अधिकचा भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र ग्राहक सेंद्रीय व रासायनिक खतांनी पिकविलेल्या मालातील फरक लक्षात घेतल्या जात नाही. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या मालाला अधिकची किंमत मिळत नाही. परिणामी शेतकरी रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर सर्रास करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती