शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रीत वाहतुकीने चार जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:51 IST

दुर्गम भागात वाहनांची कमतरता असल्याने एका वाहनात २० ते २५ प्रवाशी बसवून नेले जातात. याकडे पोलीस विभागही दुर्लक्ष करीत असल्याने अनियंत्रीत वाहतुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. याच अनियंत्रीत वाहतुकीमुळे आलापल्ली-भामरागड मार्गावर कोडसेपल्ली गावाजवळ बुधवारी ११ वाजताच्या सुमारास अपघात झाला.

ठळक मुद्देमृतकांमध्ये कोडसेपल्लीतील तिघे : प्रवाशी वाहन व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/आलापल्ली/पेरमिली : दुर्गम भागात वाहनांची कमतरता असल्याने एका वाहनात २० ते २५ प्रवाशी बसवून नेले जातात. याकडे पोलीस विभागही दुर्लक्ष करीत असल्याने अनियंत्रीत वाहतुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. याच अनियंत्रीत वाहतुकीमुळे आलापल्ली-भामरागड मार्गावर कोडसेपल्ली गावाजवळ बुधवारी ११ वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर १७ जण जखमी झाले आहेत. यामध्ये नऊ गंभीर आहेत.कुमा बंडू लेकामी (५०), झुरी दस्सा गावडे (६५) व चुक्कू करपा आत्राम (६५) तिघेही रा. कोडसेपल्ली, प्रवाशी वाहनाचा चालक विनोद राजन्ना सुरमवार (२८) रा. दामरंचा अशी मृतकांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये पोच्चा जोगी तलांडे (४५) रा. पालेकसा, येल्लुबाई पोचम गड्डमवार (५०) रा. अहेरी, जोन्ना चेतू आत्राम (३०) रा. एकरा, बाबाजी वारलु गोंगले (६२), चैतू चिन्ना तलांडे (४५), चिन्ना इरपा तलांडे (४५), खोई केशव आत्राम (५५), मासा पेंकू तलांडी (६५), कोटके गुंडा आत्राम (३०) सर्व रा. कोडसेपल्ली यांचा समावेश आहे. यातील काही जखमींना गडचिरोली तर काहींना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.इरपा मटला आत्राम (३०) रा. पालेकसा, कोत्ता बक्का आत्राम (४०) रा. पालेकसा, भास्कर आश्चन्ना राऊत (६०) रा. अहेरी, बोढा तोढा तलांडी (५०) रा. कोडसेपल्ली, हनमंतू नामय्या कोंडीवार (६०), अंजू ताजखान पठाण (२५), व्यंकम्मा रामलू रूद्रपल्लीवार (६०), पद्मा जंगलसिंग मडावी (२९) सर्व रा. आलापल्ली हे किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर अहेरी येथील आलापल्ली रूग्णालयात उपचार सुरू आहेत.पेरमिली, येरमनार, कोडसेपल्ली, मांड्रा, दामरंच्चा या मार्गावर एसटी बसची सोय नसल्याने नागरिकांना खासगी वाहनाने आलापल्ली येथे जावे लागते. बुधवारी भामरागड येथे आठवडी बाजार असल्याने भाजीपाला घेऊन ट्रक भामरागडकडे जात होता. दोन्ही वाहने भरधाव वेगात होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली. या परिसरातील अनियंत्रीत व अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. नऊ प्रवाशी बसू शकणाऱ्या वाहनात तब्बल २५ पेक्षा अधिक प्रवाशी बसविले जातात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. पैशाच्या लालसेने वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी भरतात. तर दुसरे वाहन मिळत नसल्याने वाहनात बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसतानाही प्रवाशी वाहनात बसतात. ३ एप्रिल रोजी तलवाडा गावाजवळ दुचाकी व मालवाहू पीकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दिवसेंदिवस अपघात वाढले आहेत. यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.सामाजिक संघटनांकडून मदतीचा हातअपघात झाल्याची माहिती कळताच हेल्पिंग हॅन्ड सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रतिक मुधोळकर, दीपक सुनतकर, असाद सय्यद, विकास तोडसाम, किशोर अग्गुवार, योगेश सडमेक यांनी रूग्णांना उपचाराकरिता मदत केली.नायब तहसीलदार दिनकर खोत, सभापती सुरेखा आलाम, जि.प. सदस्य अजय नैताम, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, दिवाकर आलाम, विनोद रामटेके, प्रशांत गोडसेलवार यांनी रूग्णालयात जाऊन रूग्णांची पाहणी केली.रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. हकीम, डॉ. अनंत जाधव, डॉ. अश्लेषा गाडगीळ, डॉ. चेतन इंगोले यांच्यासह रूग्णालयातील कर्मचारी एस. मोटगू, एस. रायपुरे, प्रेरणा झाडे, वनिता मडावी, करिश्मा चिडे, एस. करमे, फ्लारेन्स नेहमिया, मेहमूहाबी पठाण, पद्मा सारवत, विनीत खोके, निखील कोंडापर्ती, मधू मंचर्लावार यांनी उपचार केले.

टॅग्स :Accidentअपघात