शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

हळदीमालच्या पुलामुळे पावसाळ्यात अडते वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:27 IST

चामाेर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी-हळदीमाल गावादरम्यान मोठा नाला आहे. या नाल्यावर ३० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. हा पूल ...

चामाेर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी-हळदीमाल गावादरम्यान मोठा नाला आहे. या नाल्यावर ३० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. हा पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वाहत असते. यामुळे वाहतूक ठप्प होते. त्यामुळे याठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून एस. टी. महामंडळाच्या बसेस, दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा करत असतात. हा नाला वैनगंगा नदीला जोडला असून पूल आणि नदी यामधील अंतर एक किलोमीटर आहे. वैनगंगा नदीला भरती आल्यानंतर या पुलापर्यंत दाब निर्माण होतो.

धानाेरातील नवीन वस्त्या दुर्लक्षित

धानाेरा : शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये अद्यापही पक्के रस्ते बांधण्यात आले नाहीत. या भागातील नागरिक सार्वजनिक मूलभूत सोईसुविधांपासून वंचित आहेत. स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून सोईसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाढीव वस्त्यांमधील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. येथील बहुतांश रस्ते कच्चे आहेत. पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते, तर हिवाळा व उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करावा लागताे. मागील ३ वर्षांपासून येथे पक्के रस्ते व नाल्या बांधण्याची मागणी आहे. नागरिकांना पावसाळ्यात माेठा त्रास सहन करावा लागताे. तरीही दखल घेतली जात नाही. या मागणीकडे दुर्लक्षच असल्याचे दिसून येते. वाॅर्डातील नागरिकांना त्रास हाेत असल्याने स्थानिक प्रशासनाने पक्के बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

व्यंकटापूर परिसरातील वीज समस्येने नागरिक त्रस्त

अहेरी : तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: रात्रीच्या सुमारास वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत; परंतु सुरळीत वीजपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यात देवलमरी-इंदाराम परिसरात इंदाराम, काटेपल्ली, कोलपल्ली, व्यंकटरावपेठा, वट्रा खुर्द, वट्रा बुज, व्यंकटापूर, आवलमरी, संड्रा, मोदूमतुर्रा आदी गावांचा समावेश होतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना कुलर, पंखे लावावे लागतात. त्यामुळे नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी हाेत आहे; परंतु या समस्येकडे अभियंते दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

गेवर्धा-शिरपूर मार्गाचे रुंदीकरण करा

कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा-अरततोंडी-शिरपूर या मार्गावरील वर्दळ वाढल्याने मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरून कुरखेडा-शिरपूर बसचे आवागमन होते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे.

आलापल्लीत फवारणी करण्याची मागणी

आलापल्ली : येथील अनेक वॉर्डातील नाल्यांचा गाळ उपसा करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, वॉर्डात डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये फवारणी करावी.

झिंगानूर परिसरातील बंधारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष

झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे.