शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

वनजमीन न मिळाल्याने रखडला तुलतुली प्रकल्प

By admin | Updated: May 28, 2015 00:54 IST

तालुक्यातील खोब्रागडी नदीवर प्रस्तावित तुलतुली हा मोठा सिंचन प्रकल्प रखडलेला आहे.

केंद्र सरकारचे दुर्लक्ष : खोब्रागडी नदीवर बांधकामआरमोरी : तालुक्यातील खोब्रागडी नदीवर प्रस्तावित तुलतुली हा मोठा सिंचन प्रकल्प रखडलेला आहे. या प्रकल्पाच्या पर्यायी वनजमिनीची आवश्यकता पूर्ण करता न आल्याने हा प्रकल्प रखडलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तुलतुली गावाजवळ खोब्रागडी नदीवर हा प्रकल्प होणार होता. या प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता १७ डिसेंबर १९७९ रोजी देण्यात आली. १९१५.७० लक्ष रूपये त्यावेळी या प्रकल्पावर खर्च होणार होता. सदर प्रकल्पाची ३० हजार ५९० हेक्टर सिंचन क्षमता निश्चित करण्यात आली होती. या प्रकल्पावर ६२०.८५ लक्ष रूपयांचा खर्च प्रकल्पाचे काम बंद होईपर्यंत झालेला आहे. या प्रकल्पाच्या प्राथमिक कामात १९८० मध्ये सुरूवात करण्यात आली. त्यावेळी धरणस्थळ करीता पोच मार्ग, स्थायी/ अस्थायी इमारत, गोडावून, धरण स्थळाचे स्ट्रिपींग इत्यादी कामे मे १९८३ पर्यत सुरू होती. सदर प्रकल्पामध्ये २२२८.०६ हेक्टर वनजमिन बाधित होत असून सदर प्रकल्पाचे काम वनजमिन निर्वणीकरण मान्यतेअभावी बंद आहे. तेव्हापासून शासनस्तरावर हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला नाही. अनेकदा निवडणुका आल्या की हा प्रकल्प मार्गी लावू असे आश्वासन दिले जाते. मात्र अद्यापही या प्रकल्पाबाबत निर्णय झालेला नाही. या प्रकल्पाची किंमतही आता वाढली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)प्रकल्प निर्मितीतील अडचणकेंद्र शासनाचे निर्देशाप्रमाणे लाभक्षेत्राकरिता पर्यायी प्रकल्प होण्याचे दृष्टीने अभ्यास अन्वेषण मंडळामार्फत करण्यात आला असून पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ, नागपूर यांनी ११ जून २०१० अन्वये प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी २४३.८० मी. ऐवजी २३८.०० मी. घेऊन त्याप्रमाणे प्रस्ताव मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांना सादर केले. करण्यात आलेल्या पर्यायी वनजमीन आवश्यक त्या प्र्रमाणात कमी करता आलेली नसल्याचे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर यांनी २३ जून २०१२ चे पत्रान्वये कळविले आहे. त्यामुळे सदर प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव मंडळाचे पत्र १९ डिसेंबर २०१२ अन्वये प्रादेशिक कार्यालयास सादर करण्यात आला.