शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:42 IST

घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरातील कचºयाची उचल करून शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून केंद्र शासनाने साहित्य खरेदी व मनुष्यबळाचे वेतन देण्यासाठी गडचिरोली नगर परिषदेला पुन्हा १ कोटी ८३ लाख रूपयांचा निधी देणार आहे.

ठळक मुद्देसाधने वाढणार : प्रत्येक घरातून कचऱ्याची उचल करण्याचे नियोजन
<p>दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरातील कचऱ्याची उचल करून शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून केंद्र शासनाने साहित्य खरेदी व मनुष्यबळाचे वेतन देण्यासाठी गडचिरोली नगर परिषदेला पुन्हा १ कोटी ८३ लाख रूपयांचा निधी देणार आहे.पुढील दोन वर्षांत स्वच्छ भारत निर्माण करायचा आहे. त्यादृष्टीने केंद्र शासन टप्प्याटप्प्याने उपक्रम राबवित असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला देत आहे. सुरूवातीला हागणदारीमुक्त शहर करण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर आता प्रत्येक शहर स्वच्छ होईल यावर विशेष लक्ष दिला जात आहे. गडचिरोली शहरात घंटागाड्यांच्या माध्यमातून कचऱ्याची उचल केली जाते. मात्र घंटागाड्यांच्या माध्यमातून उचल केलेला कचरा जवळपासच्या कचराकुंडीमध्ये टाकला जातो. कधीकधी कचराकुंडी कचऱ्याने पूर्णपणे भरून कचरा बाजुला पडून राहतो. त्यामुळे कचराकुंडीमुळेच अस्वच्छता निर्माण होते. घंटागाडीत जमा झालेला कचरा डम्पिंग यार्डवर नेऊन टाकणे शक्य होत नाही. परिणामी घंटागाडी चालक जवळपासच्या कचराकुंडीमध्ये कचरा टाकतात. यावर उपाय म्हणून एक टन क्षमतेच्या पाच गारबेज ट्रिपर वाहने खरेदी केली जाणार आहेत. सदर वाहनात घंटागाडीतील कचरा टाकला जाईल. त्यानंतर तो कचरा वाहनाद्वारे डम्पिंग यार्डमध्ये टाकला जाईल. प्रत्येक घरातील कचऱ्याची उचल व्हावी यासाठी पुन्हा १९ घंटागाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. दर दिवशी रस्ते साफ केले जातील. प्रत्येक सफाई कामगाराला ७५० मीटर रस्ता झाडण्याचे उद्दिष्ट दिले जाईल. त्याच्या मागे ढक्कलगाडी राहिल. शहरातील रस्त्यांची लांबी लक्षात घेतली तर ७० सफाई कामगार लागतील. सध्या नगर परिषदेकडे २९ कामगार कार्यरत आहेत. त्यात आता पुन्हा ७० कामगारांची भर पडणार आहे. बाजारपेठेतील कचऱ्याची उचल करण्यासाठी दोन टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले चार वाहने खरेदी केली जाणार आहेत. दररोज किती कचरा जमा होतो, याचे मोजमाप करण्यासाठी वेट ब्रिज सुध्दा खरेदी केला जाणार आहे.ओला व सुका कचºयाबाबत जनजागृती गरजेचीओल्या कचºयामध्ये विशेष करून भाजीपाला व इतर विघटनशील पदार्थांचा समावेश होतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, काच आदींचा समावेश होतो. कचऱ्याचे विघटन करताना ओला व सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ आहे. नागरिकांनी स्वत:च ओला व सुका कचरा वेगळा करून तो कचराकुंडीच्या ओला व सुका म्हणून लिहिलेल्या टप्प्यात टाकल्यास बराच खर्च वाचण्यास मदत होते. शहरातील कचराकुंड्यांना ओला व सुका कचऱ्यासाठी दोन कप्पे दिले आहेत. मात्र त्याप्रमाणे कचरा टाकला जात नाही. यासाठी नगर परिषदेने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.