शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:42 IST

घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरातील कचºयाची उचल करून शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून केंद्र शासनाने साहित्य खरेदी व मनुष्यबळाचे वेतन देण्यासाठी गडचिरोली नगर परिषदेला पुन्हा १ कोटी ८३ लाख रूपयांचा निधी देणार आहे.

ठळक मुद्देसाधने वाढणार : प्रत्येक घरातून कचऱ्याची उचल करण्याचे नियोजन
<p>दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरातील कचऱ्याची उचल करून शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून केंद्र शासनाने साहित्य खरेदी व मनुष्यबळाचे वेतन देण्यासाठी गडचिरोली नगर परिषदेला पुन्हा १ कोटी ८३ लाख रूपयांचा निधी देणार आहे.पुढील दोन वर्षांत स्वच्छ भारत निर्माण करायचा आहे. त्यादृष्टीने केंद्र शासन टप्प्याटप्प्याने उपक्रम राबवित असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला देत आहे. सुरूवातीला हागणदारीमुक्त शहर करण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर आता प्रत्येक शहर स्वच्छ होईल यावर विशेष लक्ष दिला जात आहे. गडचिरोली शहरात घंटागाड्यांच्या माध्यमातून कचऱ्याची उचल केली जाते. मात्र घंटागाड्यांच्या माध्यमातून उचल केलेला कचरा जवळपासच्या कचराकुंडीमध्ये टाकला जातो. कधीकधी कचराकुंडी कचऱ्याने पूर्णपणे भरून कचरा बाजुला पडून राहतो. त्यामुळे कचराकुंडीमुळेच अस्वच्छता निर्माण होते. घंटागाडीत जमा झालेला कचरा डम्पिंग यार्डवर नेऊन टाकणे शक्य होत नाही. परिणामी घंटागाडी चालक जवळपासच्या कचराकुंडीमध्ये कचरा टाकतात. यावर उपाय म्हणून एक टन क्षमतेच्या पाच गारबेज ट्रिपर वाहने खरेदी केली जाणार आहेत. सदर वाहनात घंटागाडीतील कचरा टाकला जाईल. त्यानंतर तो कचरा वाहनाद्वारे डम्पिंग यार्डमध्ये टाकला जाईल. प्रत्येक घरातील कचऱ्याची उचल व्हावी यासाठी पुन्हा १९ घंटागाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. दर दिवशी रस्ते साफ केले जातील. प्रत्येक सफाई कामगाराला ७५० मीटर रस्ता झाडण्याचे उद्दिष्ट दिले जाईल. त्याच्या मागे ढक्कलगाडी राहिल. शहरातील रस्त्यांची लांबी लक्षात घेतली तर ७० सफाई कामगार लागतील. सध्या नगर परिषदेकडे २९ कामगार कार्यरत आहेत. त्यात आता पुन्हा ७० कामगारांची भर पडणार आहे. बाजारपेठेतील कचऱ्याची उचल करण्यासाठी दोन टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले चार वाहने खरेदी केली जाणार आहेत. दररोज किती कचरा जमा होतो, याचे मोजमाप करण्यासाठी वेट ब्रिज सुध्दा खरेदी केला जाणार आहे.ओला व सुका कचºयाबाबत जनजागृती गरजेचीओल्या कचºयामध्ये विशेष करून भाजीपाला व इतर विघटनशील पदार्थांचा समावेश होतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, काच आदींचा समावेश होतो. कचऱ्याचे विघटन करताना ओला व सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ आहे. नागरिकांनी स्वत:च ओला व सुका कचरा वेगळा करून तो कचराकुंडीच्या ओला व सुका म्हणून लिहिलेल्या टप्प्यात टाकल्यास बराच खर्च वाचण्यास मदत होते. शहरातील कचराकुंड्यांना ओला व सुका कचऱ्यासाठी दोन कप्पे दिले आहेत. मात्र त्याप्रमाणे कचरा टाकला जात नाही. यासाठी नगर परिषदेने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.