शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास ठरतोय धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:10 IST

गडचिरोली-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. या वर्दळीत वाहनचालकांना निश्चित ठिकाणी पोहोचण्याच्या घाईत आपला जीव गमवावा लागतो. शिवाय वाहनात असलेल्या प्रवाशांनाही अनेकदा आपल्या प्राणास मुकावे लागते.

ठळक मुद्देअपघात वाढले । गडचिरोली-आरमोरी मार्गावर काटली, मोहझरी, पोर्ला, चुरमुरा, देऊळगाव अपघातप्रवण स्थळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. या वर्दळीत वाहनचालकांना निश्चित ठिकाणी पोहोचण्याच्या घाईत आपला जीव गमवावा लागतो. शिवाय वाहनात असलेल्या प्रवाशांनाही अनेकदा आपल्या प्राणास मुकावे लागते. गेल्या दोन ते तीन वर्षांत या ३४ किमी मार्गावर अनेक किरकोळ व गंभीर अपघात घडल्याने अनेकांचा बळी गेला आहे. दिवसेंदिवस राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास धोक्याचा ठरत आहे.गडचिरोली-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावरून २४ तास वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर जवळपास १० गावे रस्त्याला लागून आहेत. विशेष म्हणजे मार्गावरील एकाही गावालगत गतिरोधक नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनेही सुसाट पळविली जातात. दिवस-रात्र हा वेग कायम असतो. वाहनचालकांना निश्चित स्थळी पोहोचण्याची घाई नेहमीच राहत असल्याने किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असतात. अवजड वाहनांसह एसटी महामंडळाच्या बसेसही सुसाट चालविल्या जातात. विशेषत: परस्पर विरूद्ध दिशेने वाहने येतानाही ओव्हरटेक करून आपले वाहन समोर कशाप्रकारे नेता येईल, या हेतूने वाहने चालविली जात असल्याने अपघात घडतात. परस्पर विरूद्ध दिशेने वाहन येऊन जोरदार धडक झाल्यास गंभीर स्वरूपाचा अपघात घडतो.गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी फाटा, गोगाव फाटा, पाल नदीलगतचे वळण त्यानंतर साखरा, काटली, नगरी फाट्यालगतचे वळण, मोहझरीलगतचे चढते वळण, पोर्ला बसथांबा, वडधा मार्ग फाटा, वसा, चुरमुरा, किटाळीलगतचे वळण, देऊळगावनजीकचे वळण, खोब्रागडी नदी पूल, वैरागड फाटा, गाढवी नदीलगतचे वळण, आरमोरी स्मशानभूमीकडे जाणारा फाटा तसेच आरमोरी शहरातील मुख्य मार्ग आदी ठिकाणे अपघातप्रवण स्थळ बनली आहेत. चार वर्षांपूर्वी साखरा, किटाळीजवळ काळीपिवळीला अपघात होऊन काही लोकांचा बळी गेला. तर काहींना गंभीर जखमी व्हावे लागले होते. देऊळगावनजीकच्या वळणावर चारचाकी वाहनाला अपघात होऊन एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना आपल्या जीवाला मुकावे लागले होते.मागील वर्षी चुरमुराजवळ कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चारचाकी वाहन रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला रात्रीच्या सुमारास धडकल्याने सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याशिवाय नवीन वर्षात कठाणी नदीच्या नवीन पुलावर दुचाकीला अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला. तसेच जुन्या पुलावरून आॅटोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने आॅटो नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. या ३४ किमी मार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत असल्याने मार्ग धोकादायक ठरत आहे.मोहझरीजवळ दीड महिन्यात दुसरा अपघातगडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील काटली-मोहझरीदरम्यान नेहमीच अपघात घडत असतात. यात किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या अपघातांचा समावेश असतो. २०१९ मध्ये २१ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात काळी-पिवळी वाहनानाची झाडाला जबर धडक बसली. यामध्ये दोघे ठार तर १२ प्रवासी जखमी झाले होते. विशेष म्हणजे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला होता. त्यानंतर आता शुक्रवार ३ मे रोजी काटलीजवळ दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान एसटी महामंडळाच्या बसने बांबू भरलेल्या ट्रकला जबर धडक दिल्याने चालकासह तिघेजण जखमी झाले. ओव्हरटेक करण्याच्या नादात सदर अपघात घडल्याचे प्रवाशांमध्ये चर्चा होती.

टॅग्स :Accidentअपघात