शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

रेल्वेच्या भुयारी मार्गामुळे चौकात वाढतेय वाहनांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST

देसाईगंज : शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे गेल्याने देसाईगंज शहर दोन भागात विभागल्या गेले आहे. त्यामुळे पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चिम ...

देसाईगंज : शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे गेल्याने देसाईगंज शहर दोन भागात विभागल्या गेले आहे. त्यामुळे पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चिम भागात जाण्यासाठी भुयारी मार्गाची निर्मिती केली आहे. पूर्वेला असणारे रेल्वेफाटक, कुरखेडा बाजू व लाखांदूर बाजू या पूर्णतः बंद करण्यात आल्या. त्यामुळे निर्माण झालेल्या दाेन्ही चौकात प्रवासी वाहनांनी ठिय्या मांडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

रेल्वेच्या भुयारी मार्गामुळे चौकात वाहनांची गर्दी वाढत आहे.

शहराच्या दोन भागाच्या आवागमनासाठी भुयारी मार्गाची निर्मिती झाली असून, हा मार्ग नागमोडी वळणाचा आहे. त्यातच या मार्गाची उंची ही मर्यादित असल्याने काही अवजड वाहने सरळ कुरखेडा मार्गावरून बायपासने तर लाखांदूर मार्गाची अवजड वाहने बायपास मार्गाने जातात. त्यामुळे या चौकात भुयारी व बायपासने जाणाऱ्या वाहनांची नेहमीच क्रॉसिंग होते. त्यातल्यात्यात या चौकाच्या निर्मितीमुळे जी मोकळी जागा उपलब्ध झाली त्या ठिकाणी प्रवासी वाहने भुयारी मार्गाच्या तोंडावरच उभी राहत असल्याने भुयारी मार्गातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना फारच अडचण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील बसस्थानक हे आरमोरी-कुरखेडा या राज्य महामार्गावर असल्याने कमी पल्ल्यांच्या गाड्यांना यू टर्न घ्यावा लागतो. पण या वाहनांच्या गर्दीमुळे बस वळविण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे या वाहनांची होणारी गर्दी हटवून त्यांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी, भुयारी मार्गातून होणारी वाहतूक सुकर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.