शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

दीड महिन्यांच्या संचारबंदीने व्यापारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST

सिरोंचा : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला कोरोना संसर्गाचा जबरदस्त फटका बसला आहे. ...

सिरोंचा : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला कोरोना संसर्गाचा जबरदस्त फटका बसला आहे. सिरोंचा तालुकास्थळ व तालुक्यातील अनेक गावेही कोरोना संसर्गाने प्रभावित झाली. २०२० च्या पहिल्या लाटेपेक्षा २०२१ ची दुसरी लाट संसर्गाचे विविध स्टेरन घेऊन आली. संचारबंदीचा तिसरा टप्पा सुरू असून ३१ मे २०२१ पर्यंत राहणार आहे. सततच्या संचारबंदीतून व्यापारीवर्गाचे व्यवसाय रुळांवर, पूर्वपदांवर येण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा यावर्षीच्या कोरोनाने व्यापार पूर्ण ठप्प करून टाकला. दीड महिन्यांच्या संचारबंदीने व्यापारी त्रस्त झाले आहेत.

नेहमीच्या संचारबंदीमुळे लहान व मध्यम दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे. यात श्रीमंत मोठे दुकानदार जे होलसेल व किरकोळ (ठोक व चिल्लर) विक्री करतात, अशा व्यापा-यांना काही फरक पडत नाही. पण, गरीब व मध्यम दुकानदारांचे हाल सुरू आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीप्रमाणे मध्यमवर्गीय कुटुंबे मूठ झाकून गाडा चालवित आहे. उन्हाळा म्हणजे सर्वच व्यावसायिकांना सुगीचे दिवस असतात. उन्हाळ्यात परराज्यांतील काही व्यावसायिक येऊन चारचाकी हातगाडीवर दिवसभर फिरून शीतपेय विकत असत. परंतु, भर उन्हाळ्यात संचारबंदी व संसर्गाच्या भीतीने त्यांचे व्यवहार पूर्णतः बंद झाले. काहींनी व्यवसाय बदलवून भाजीपाला व फळेविक्रीचे कार्य सुरू केले. संचारबंदीचा पहिला टप्पा १४ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजेपासून ३० एप्रिल पर्यंत १५ दिवस आणि दुसरा टप्पा १ मे ते १५ मे २०२१ पर्यंत १५ दिवस, तिसरा टप्पा १६ मे ते ३१ मे २०२१ पर्यंत सुरू आहे. याशिवाय, वीकेंड लाॅकडाऊन म्हणून शनिवार व रविवार दोन दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे.

या दीड महिन्यांच्या संचारबंदीने सर्वच व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. व्यवसाय बंद असला तरी दररोजचा कुटुंबाचा खर्च, दुकानाचे भाडे, विद्युतबिले, या सर्वांचा भार सहन करावा लागतो. यावेळच्या लाॅकडाऊनमध्ये शासनाच्या निर्बंधांचे योग्य रीतीने पालन होताना दिसत नाही. फक्त किराणा व भाजीपाला विक्रेत्यांनाच सकाळी ७ ते ११ पर्यंत विक्रीसाठी परवानगी दिली आहे. परंतु, याव्यतिरिक्त काही निर्बंध असलेली दुकानेही या वेळेत उघडून व्यापारी बसलेले असतात. पण, काही दुकानदार नियमांचे पालन करीत पूर्णपणे बंद ठेवून आहेत. घर आणि दुकान एकाच ठिकाणी असलेले दुकानदार दिवसभर विक्री करत असल्याचे दिसून येते. संचारबंदीत बांधकामांना निर्बंध असले तरी बांधकामे नेहमीप्रमाणे सुरू आहेत. रेतीचा कुठेच तुटवडा नसल्याचे दिसते. एकंदरीत, या संचारबंदीचा फटका सर्वसामान्य व्यापारीवर्गाला बसत आहे.