शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

२०२१ पर्यंत प्रत्येक घरी राहणार शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

पंतप्रधानांनी स्वच्छतेचा मूलमंत्र देत संपूर्ण देशवासीयांना गोदरीमुक्तीसाठी आवाहन केले. दरम्यान स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि शहरी अंतर्गत वैयक्तिक शौचालयाची योजना व्यापक स्वरूपात राबविण्यात आली. काही लोकांनी अनुदानाचा पहिला हप्ता घेतला. मात्र शौचालय बांधले नाही. काहींनी शौचालय बांधले. मात्र त्याचा वापर अजूनही सुरू केला नाही. गावात ९० टक्के शौचालय झाल्याच्या सर्वेक्षणावरून अनेक गावांना गोदरीमुक्त घोषित करून पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ वाढली : ‘घर तिथे शौचालय’ मोहीम सुरू

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१२ पासून २०१९ या कालावधीत शासनाच्या विविध योजनेतून वैयक्तिक शौचालयाची जम्बो मोहीम राबविण्यात आली. मात्र अद्यापही गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात अनेक कुटुंब शौचालयाविना आहेत. आता २०२१ च्या जनगणनेत एकही कुटुंब शौचालयाविना दिसणार नाही, यासाठी शासन-प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी प्रत्येक घरी शौचालय उभे करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.पंतप्रधानांनी स्वच्छतेचा मूलमंत्र देत संपूर्ण देशवासीयांना गोदरीमुक्तीसाठी आवाहन केले. दरम्यान स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि शहरी अंतर्गत वैयक्तिक शौचालयाची योजना व्यापक स्वरूपात राबविण्यात आली. काही लोकांनी अनुदानाचा पहिला हप्ता घेतला. मात्र शौचालय बांधले नाही. काहींनी शौचालय बांधले. मात्र त्याचा वापर अजूनही सुरू केला नाही. गावात ९० टक्के शौचालय झाल्याच्या सर्वेक्षणावरून अनेक गावांना गोदरीमुक्त घोषित करून पुरस्कार प्रदान करण्यात आले. अनुदानापोटी केंद्र व राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. मात्र महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात शौचालय नसणारी ५ ते १० टक्के कुटुंब असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पं.स.स्तरावरील संवर्ग विकास अधिकारी व ग्रा.पं.स्तरावरील ग्रामसेवक यांच्याकडून शौचालयाबाबतचा वस्तूनिष्ठ अहवाल डिसेंबर महिन्यात घेण्यात आला. या अहवालावरून गडचिरोली जिल्ह्यातील १० हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याची माहिती उजेडात आली आहे. शौचालय नसल्याबाबतची अंतिम माहिती पाठविण्याची मुदत १५ जानेवारी २०१९ पर्यंत जि.प.प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शौचालय नसणाऱ्या जिल्ह्यातील कुटुंबांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शौचालयाविना जे कुटुंब आहेत, त्यांना सरकारी अनुदानातून शौचालय बांधता यावे, यासाठी घर तिथे शौचालय ही मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावयाचे आहेत, असे निर्देश आहेत.जनगणनेत होणार नोंद२०२१ मध्ये होणाºया जनगणनेत विविध प्रकारचे जवळपास २३ प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामध्ये कुटुंबाकडे शौचालय आहे किंवा नाही, याचा स्पष्ट रकाना नमूद आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा, महाराष्ट्र राज्य अर्थातच भारतात किती कुटुंबाकडे शौचालय आहे, किती कुटुंबाकडे शौचालय नाही, याचा तंतोतंत आकडा शासनाला मिळणार आहे. परिणामी जगाला सुद्धा शौचालयाबाबतची भारताची स्थिती कळणार आहे.- तर दाखलेच मिळणार नाहीमार्च २०२० पर्यंत ज्या कुटुंबांकडे शौचालय दिसणार नाही, अशा कुटुंबांना ग्रामपंचायतीकडून लागणारे कोणतेही दाखले द्यावयाचे नाहीत, अशी भूमिका जि.प.प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. याबाबत बिडीओ व ग्रामसेवकांच्या बैठकीत मंथन करण्यात आल्याची माहिती आहे. शौचालय बांधकामात हयगय करणाºया बिडीओ व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिला आहे.लाभार्थ्यांना अंतिम संधीसन २०१२ पासून वैयक्तिक शौचालयाची योजना राबविण्यात आली. त्यापूर्वीही त्या-त्या सरकारच्या काळात शौचालय बांधकाम, दुरूस्तीसाठी योजना राबविण्यात आली. मात्र त्यानंतरही काही कुटुंब शौचालयाच्या योजनेपासून दूर राहिले. अशा लाभार्थ्यांना शासकीय अनुदानातून शौचालय बांधण्याची शेवटची संधी आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत वैयक्तिक शौचालय बांधून पूर्ण करावयाचे आहेत, तसे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पं.स.बीडीओ व ग्रामसेवकांना दिले आहे.सात वर्षात बांधले १ लाख १३ हजार शौचालय२०१२ मध्ये शौचालयाबाबत कुटुंबाचे पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले. २०१२ पासून २०१९ पर्यंत शासकीय योजनेतून गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख १३ हजार वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले. त्यानंतर २०१९ मध्ये दोन महिन्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आलेल्या २६ हजार वाढीव कुटुंबांना शौचालय मंजूर करण्यात आले. सदर शौचालय ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना