शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

वैनगंगेत जलपर्यटनाचा प्रस्ताव थंडबस्त्यात

By admin | Updated: November 18, 2014 22:54 IST

जिल्ह्यात पर्यटन उद्योगाला वाव देण्यासाठी देसाईगंज ते सिरोंचा जलपर्यटन प्रारंभ करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने दोन वर्षापूर्वी योजना तयार केली होती. यासंदर्भात शासनालाही

बंधारे बांधावे लागणार : ‘सी प्लेन’ उतरविण्याची नवी योजनागडचिरोली : जिल्ह्यात पर्यटन उद्योगाला वाव देण्यासाठी देसाईगंज ते सिरोंचा जलपर्यटन प्रारंभ करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने दोन वर्षापूर्वी योजना तयार केली होती. यासंदर्भात शासनालाही योजनेचा प्रारूप आराखडा पाठविण्यात आला होता. परंतु शासनाने या योजनेला मूर्तरूप दिले नाही. त्यामुळे ही योजना कागदावरच राहिले आहे. आता विदर्भात खिंडसी ‘सी प्लेन’चा प्रयोग यशस्वी झाला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वैनगंगा नदीत असा प्रयोग करण्यात येईल, असे आश्वासन गडचिरोलीकरांना दिले होते. वैनगंगा नदीत प्रत्येक १० किमीनंतर बंधारे बांधून पाणी अडवून या ठिकाणी पर्यटन कम जलसिंचन असा दुहेरी हेतू साध्य करणारी योजना तयार करण्याचा मानस त्यांनीं व्यक्त केला होता. या ठिकाणी पर्यटनालाही चालना मिळेल, अशी ही योजना आहे. परंतु यासाठी वैनगंगेत बंधारे बांधण्याचे काम पहिले सुरू करावे लागणार आहे.विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या मार्कंडा ते चपराळा अभयारण्यापर्यंत वैनगंगा नदीत जलपर्यटन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली होती. जिल्ह्यात वैनगंगा, इंद्रावती, खोब्रागडी, गोदावरी, प्राणहिता, कठाणी, पर्लकोटा, पामुलगौतम, सती आदी नद्या आहेत. यात जलपर्यटन सुरू करून रोजगाराची नवी संधी जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देण्याविषयी प्रारूप आराखडा तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी तयार केला होता. व तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविला होता.सिरोंचा तालुक्यात प्राणहिता, इंद्रावती, गोदावरी या नद्यांमध्ये बाराही महिने पाणी राहते. या नद्यांमध्ये जलपर्यटनाला चालना देऊन पर्यटकांना जिल्ह्याकडे आकर्षित करण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. याअंतर्गत देसाईगंज, गडचिरोली, मार्कंडा, आष्टी, चपराळा, वांगेपल्ली, अहेरी, सिरोंचा या नदीघाटांवरमासेमारी करणाऱ्यांनाही मोटारबोट देण्याची तयारी प्रशासनाने केली होती. देसाईगंजचे पर्यटक नदीमार्गे सिरोंचापर्यंत पोहोचून आंध्रप्रदेशातील कालेश्वर मंदिराचेही दर्शन घेऊ शकतील. अशीही या प्रस्तावात सूचना होती. या प्रस्तावातील तांत्रिक अडचणी सध्या तपासून पाहण्यात येवून त्याला मूर्तरूप दिले जाणार होते. मार्कंडा येथे दर्शन घेऊन जलमार्गाने तत्काळ चपराळ्यालाही जाता येणे शक्य होणार होते. पावसाळ्याच्या दिवसात गावांचा तुटणारा संपर्कसुद्धा जोडून ठेवण्यात यश येईल. व नदी घाटावरील भागात मोटारबोट उपलब्ध होणार असल्याने तेथे तत्काळ सुविधाही पोहोचविता येतील, अशी प्रशासनाची धारणा होती. त्यादृष्टीने पर्यटन वाढीला व वनपर्यटनाला महत्व देण्यात येणार होते. या जलपर्यटनाच्या कार्यक्रमात आष्टी येथील इंग्रजकालीन विश्रामगृहाला रिसोर्ट बनविण्याचीही प्रस्तावात सूचना होती. मार्कंडावरून चपराळाकडे निघालेल्या पर्यटकाला आष्टी येथे थांबता येणेही शक्य होईल, असे नमुद करण्यात आले होते. हा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला. मात्र त्यानंतर यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे जलपर्यटन अद्याप कागदावरच राहिले आहे.मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वैनगंगा नदीत ‘सी प्लेन’मार्फत पर्यटनाला चालना देणारा प्रयोग गडचिरोली जिल्ह्यातही करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. सध्या मेहर विमान कंपनी (मेरीटाईम एनर्जी हेल एअर सर्व्हिसेस) सोबत महाराष्ट्र शासन व राज्य पर्यटन विकास महामंडळ हा प्रयोग राबवित आहे. प्रवरा धरणानंतर विदर्भातील खिंडशी प्रकल्पात हा प्रयोग यशस्वी करण्यात आला. वैनगंगा नदीवर बंधारे बांधून जलपर्यटन तसेच हवाई पर्यटन करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या जहाज बांधणी विभागामार्फत या योजनेसाठी गडचिरोलीकरिता विशेष निधीही उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले होते. गडचिरोलीत वैनगंगा नदी देसाईगंजपासून सिरोंचापर्यंत वाहत जाते. या नदीत हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रत्येक १० किमी अंतरावर बंधारे करून पाण्याची अडवणूक करावी लागणार आहे. या पाण्याचा शेती सिंचनासोबतच जलपर्यटन तसेच हवाई पर्यटनासाठीही वापर होईल. याशिवाय वैनगंगेच्या काठावर व्यावसायिक मालही उभारले जातील. ही योजना मूर्तरूपात साकारल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे चित्र पालटण्यास मदत होईल. (जिल्हा प्रतिनिधी)