शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नक्षलवाद्यांच्या चातगाव दलमचे आत्मसमर्पण, तीन महिलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:12 AM

एखाद्या दलममधील सर्व सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याची ही पहिलीच घटना आहे.

गडचिरोली : नक्षल चळवळीला मोठा हादरा देत चातगाव या छोट्या दलमच्या कमांडरसह एकूण पाच सदस्यांनी तसेच इतर दलमच्या दोन अशा एकूण ७ नक्षलवाद्यांनी बुधवारी सायंकाळी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात ३ महिलांंचाही समावेश आहे. त्या सर्वांवर एकूण ३३ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. एखाद्या दलममधील सर्व सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याची ही पहिलीच घटना आहे.सहकार्य करीत नाही म्हणून आपल्याच आदिवासी बांधवांचे खून, विकासात्मक कामात आडकाठी, महिलांवर होणारे अत्याचार अशा नक्षलवाद्यांच्या धोरणाला कंटाळून आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. आत्मसमर्पण करणारे सर्व जण गडचिरोली जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत.आत्मसमर्पित नक्षलवादी : १) राकेश उर्फ गणेश सनकू आचला (३४), हा जून २००६ मध्ये टिपगड दलममध्ये भरती झाला होता. जानेवारी २०१२ पासून चातगाव दलमचा कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर २० चकमकींचे, ७ खुनाचे, २ जाळपोळीचे गुन्हे असून त्याच्यावर राज्य शासनाने ५ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. २) देवीदास उर्फ मनिराम सोनू आवला (२५), हा २०१४ पासून चातगाव दलमच्या उपकमांडरपदी कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे व खुनाचे गुन्हे आहेत. त्याच्यावर ५ लाखांचे बक्षीस होते. ३) रेश्मा उर्फ जाई दुलसू कोवाची (१९), ही २०१७ मध्ये चातगाव दलममध्ये भरती झाली होती. तिच्यावर चकमकीचे २ व खुनाचा एक गुन्हा दाखल आहे. तिच्यावर ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. ४)अखिला उर्फ राधे झुरे (२७), ही २०१२ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली होती. मे २०१९ पासून चातगाव दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ९, खुनाचे व जाळपोळीचे प्रत्येकी ३ गुन्हे आहेत. तिच्यावर ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. ५)शिवा विज्या पोटावी (२२), हा २०१४ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाला होता. सप्टेंबर २०१८ पासून चातगाव दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे ३ गुन्हे असून शासनाने ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. ६)करुणा उर्फ कुम्मे रामसिंग मडावी (२२), ही नोव्हेंबर २०१६ पासून टिपागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे २, खुनाचा १, जाळपोळीचे ३ गुन्हे असून ४ लाख ५० हजारांचे बक्षीस होते. ७) राहुल उर्फ दामजी सोमजी पल्लो (२५), हा नोव्हेंबर २०१३ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाला होता. जानेवारी २०१४ पासून प्लाटून नं.३ मध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १०, खुनाचे ४ आणि जाळपोळीचे २ गुन्हे आहेत. त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.लोकांनी साथ सोडल्याने चळवळ खिळखिळी- नक्षल चळवळीला आता लोकांची साथ मिळत नाही. नक्षलवाद्यांची उपासमार होते. पोलिसांचे अभियानही वाढले आहे. त्यामुळे सतत जीवाची भीती असते. नक्षल चळवळीत राहण्यापेक्षा आत्मसमर्पण करणाऱ्यांचे जीवन सुखी आहे हे लक्षात आले. नक्षलवाद्यांकडून लग्न करण्याचीही परवानगी नसते. आता आम्ही सुखाने राहू, अशी भावना आत्मसमर्पित नक्षल कमांडर राकेश उर्फ गणेश सनकू आचला याने पत्रकारांपुढे व्यक्त केली.- यावर्षी १ जानेवारी ते ९ आॅक्टोबर २०१९ यादरम्यान २३ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यात ३ डीव्हीसी, १ दलम कमांडर व १ उपकमांडरचा समावेश आहे. याशिवाय २१ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पण प्रथमच एखाद्या दलममधील सर्व सदस्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षलवाद्यांचे मनोबल किती ढासळले आहे, हे स्पष्ट होत असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी