शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

हजारो शिक्षक अस्थायीच

By admin | Updated: May 10, 2017 01:45 IST

मागील २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना अजूनपर्यंत स्थायी व नियमित करण्यात आले नाही.

दुजाभाव : आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना एकाच दिवशी केले स्थायी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मागील २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना अजूनपर्यंत स्थायी व नियमित करण्यात आले नाही. दुसरीकडे मात्र आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या २७९ शिक्षकांना एका दिवसातच स्थायी करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या व कार्यरत राहणाऱ्या शिक्षकांमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६०० शाळांमध्ये जळपास ५ हजार शिक्षक पूर्ण झाले आहेत. ३ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकाला स्थायी व नियमित करणे आवश्यक आहे. मात्र १९८४ पासून कार्यरत असलेल्या हजारो शिक्षकांना अजूनपर्यंत नियमित व स्थायी करण्यात आले नाही. शिक्षकांनी स्थायी करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. मात्र सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्येच पडून आहेत. २० वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षकांना सुद्धा स्थायी करण्यात आले नाही. जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजवून शिक्षक कमालीचे त्रस्त झाले आहेत. विविध प्रकारच्या त्रूट्या दाखवून सदर प्रस्ताव परत पाठविले जातात किंवा प्रलंबित ठेवले जात आहेत. जिल्ह्यात काम करणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव पडून असताना आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या २७९ शिक्षकांना ४ मे रोजी एकाच दिवशी स्थायी केले आहे व त्यांना स्थायीत्वाचे प्रमाणपत्रही वितरित केले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांबाबत अशा प्रकारचे पक्षपाती धोरण अवलंबत असल्याने शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. बाहेर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या बळकावल्या आहेत. यामुळे या जिल्ह्यातील डीएड व बीएडधारक युवकांवर अन्याय झाला आहे. आता हेच शिक्षक आपल्या स्वजिल्ह्यात परत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषद मात्र त्यांना रातोरात प्रमाणपत्र उपलब्ध करून देत आहे. या ठिकाणी नियमितपणे कार्यरत राहणाऱ्या शिक्षकांवर मात्र अन्याय केला जात आहे. सेवानिवृत्तीचा लाभ मिळण्यास अडचण सेवानिवृत्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचारी नियमित व स्थायी होणे आवश्यक आहे. मात्र शिक्षण विभागातील अधिकारी शिक्षकांना सेवानिवृत्त होण्याच्या पूर्वीपर्यंत स्थायी व नियमित करीत नाही. पाच-सहा महिने सेवानिवृत्तीचा शिल्लक असताना त्याला स्थायी व नियमित केले जाते. कर्मचाऱ्याला नियमित होण्यासाठीही धडपड करावी लागते. सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचा लाभ घेण्यासाठीसुद्धा कागदपत्रे गोळा करावी लागतात. परिणामी सेवानिवृत्तीचा लाभ मिळण्यास विलंब होतो.