शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

देसाईगंजातील कृषी केंद्रांची कसून चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:01 IST

२० जून रोजी कृषी विभागाने यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यात तिवरी गावातील एका कृषी केंद्रावर धाड टाकून बोगस डीएपी खताच्या २०० बॅग जप्त केल्या. त्यानंतर देसाईगंज तालुक्याच्या कुरूड येथे बोगस खत निर्मितीचा कारखाना असल्याचा सुगावा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना लागला. कुरूड येथील पूजा अ‍ॅग्रोक्राप प्रा. लि. कंपनीमध्ये पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याने धाड टाकली.

ठळक मुद्देकृषी विभागाचे पथक सज्ज : खत व बियाण्यांच्या साठ्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज शहरातील कृषी केंद्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून बोगस बियाणे मिळत असल्याने खरीप हंगाम सुरू होताच दरवर्षी कृषी विभागाकडून चौकशी होत असते. मात्र यंदा बोगस खत मिळत असल्याचा गुन्हा दाखल झाल्याने कृषी विभागाची झोप उडाली असून वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहे. शहर व तालुक्यातील कृषी केंद्रांमधील खत व बियाणांच्या साठ्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.२० जून रोजी कृषी विभागाने यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यात तिवरी गावातील एका कृषी केंद्रावर धाड टाकून बोगस डीएपी खताच्या २०० बॅग जप्त केल्या. त्यानंतर देसाईगंज तालुक्याच्या कुरूड येथे बोगस खत निर्मितीचा कारखाना असल्याचा सुगावा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना लागला. कुरूड येथील पूजा अ‍ॅग्रोक्राप प्रा. लि. कंपनीमध्ये पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याने धाड टाकली. दरम्यान बोगस डीएपी खताची निर्मिती करताना दोन आरोपीसह १६१ बॅग खत जप्त करण्यात आले. या प्रकरणी देसाईगंज पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये हैदराबाद येथील हर्ष फर्टिलायझर इंडस्ट्रिजच्या बॅगमध्ये डीएपी खताचा साठा उपलब्ध करून दिला आहे किंवा नाही, याची तपासणी केली जात आहे. देसाईगंजला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा लागून असून येथे एकमेव रेल्वेस्टेशन आहे. परिणामी आजूबाजूचे शेतकरी खत, बियाणे व कीटकनाशक खरेदीसाठी देसाईगंज येथे येत असतात. मात्र मागील काही वर्षांपासून येथील कृषी केंद्रांमध्ये बोगस बियाणे मिळत असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान ब्रह्मपुरी, लाखांदूर, अर्जुनी, नागभिड, आरमोरी व देसाईगंज येथील न्यायालयाने कृषी केंद्राच्या काही मालकांवर बोगस बियाणे संदर्भात गुन्ह्याखाली शिक्षा व दंड सुनावण्यात आली. त्यामुळे संबंधित कृषी केंद्र संचालकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.२०१३ मध्ये नकली बियाण्यांचे प्रकरण आले होते उजेडात१३ जून २०१३ रोजी काही कंपन्यांचे प्रमाणीत प्रमाणपत्र नसताना बियाण्यांची विक्री केल्याचे आढळून आले होते. दरम्यान कृषी विभागाच्या पथकाने देसाईगंज शहरातील कृषी केंद्रांमध्ये धाड टाकून १ लाखापेक्षा अधिक किंमतीचे नकली बियाणे जप्त केले होते.शहरातील कृषी केंद्रांमध्ये नियमित चौकशी सुरू आहे. यात खत, बियाणे व कीटकनाशक यांचा साठा व बिल याची खातरजमा केली जात आहे. आणखी १०-१२ दिवस ही चौकशी सुरू राहणार आहे.- तानाजी खरडे,उपविभागीय कृषी अधिकारीदेसाईगंज

टॅग्स :agricultureशेती