शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

दोन्ही वाहनांवरील पाच लोक रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात पाचही लोकांच्या पायांचे हाड मोडले. या अपघातग्रस्तांपैकी पुरुषोत्तम अलोने (३०) रा. कोहळीटोला ता. देवरी, अशोक बकाराम नाईक (४५) रा. अंबोरा जि.गाेंदिया आणि कांतीलाल घुघवा (१८) रा. दोडके ता. काेरची या तिघांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर तुळशीराम कवास, रा. रेंगेपार जि. गाेंदिया आणि प्यारेलाल घुघवा रा.दोडके हे गंभीर जखमी आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची मुख्यालयापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या पकनाभट्टी  येथे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास देवरी (जि.गाेंदिया) कडून येत असलेली दुचाकी आणि समोरून येणारी दुसरी दुचाकी यांच्यात जबर धडक झाली. यात दोन्ही दुचाकी वाहने रस्त्याच्या कडेला फेकल्या जाऊन तिघांना प्राण गमवावे लागले. या अपघातात दाेघे जण गंभीर जखमी आहेत. प्राप्त माहितीनुसार, देवरी येथून बेळगावकडे  जात असलेल्या दुचाकीवरून (एमएच २५, झेड ४३६७) तिघे जण प्रवास करत होते. त्यांच्या दुचाकीची समोरून येत असलेल्या दुचाकीला (सीजी ०४, एलआर ३२९५) जबर धडक बसली. त्यामुळे दोन्ही वाहनांवरील पाच लोक रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात पाचही लोकांच्या पायांचे हाड मोडले. या अपघातग्रस्तांपैकी पुरुषोत्तम अलोने (३०) रा. कोहळीटोला ता. देवरी, अशोक बकाराम नाईक (४५) रा. अंबोरा जि.गाेंदिया आणि कांतीलाल घुघवा (१८) रा. दोडके ता. काेरची या तिघांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर तुळशीराम कवास, रा. रेंगेपार जि. गाेंदिया आणि प्यारेलाल घुघवा रा.दोडके हे गंभीर जखमी आहेत. सर्वांना जखमी अवस्थेत काेरची ग्रामीण रूग्णालयात आणून प्राथमिक उपचार केल्यानंतर गडचिरोली येथे रुग्णवाहिकेने हलविण्यात आले. पण पुढील उपचार मिळण्यापूर्वीच दाेघांचा मृत्यू झाला.सदर अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका पाठविण्यासाठी १०८ क्रमांकावर संपर्क केला; परंतु रुग्णवाहिका गडचिरोली आणि चंद्रपूरला गेली असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी स्वतःची गाडी घेऊन घटनास्थळ गाठले व जखमींना कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यास मदत केली. दरम्यान, नगरसेवक गुड्डू अग्रवाल यांनीसुद्धा आपल्या वाहनाने रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. घटनास्थळी तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांना अपघाताची माहिती दिली.

चारपैकी तीन डॉक्टर गैरहजरसदर रुग्णांना कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतरही रुग्णांना बराच वेळ बाहेर तडफडत राहावे लागले. या रुग्णालयात ४ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, त्यापैकी ३ वैद्यकीय अधिकारी नेहमीप्रमाणे गैरहजर दिसून आले. होळीचा सण असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. असे असताना सदर रुग्णालय एका डॉक्टरच्या भरवशावर सुरू असल्याने रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास विलंब होत आहे. ५ गंभीर रुग्णांवर एकच डॉक्टर उपचार करीत असल्याचे चित्र गुरूवारी दिसत होते.

 

टॅग्स :Accidentअपघात