शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

तोडगट्टातील आदिवासींच्या आंदोलनाचे काय हाेणार? २२ दिवस उलटले तरीही तोडगा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 10:56 IST

आता साखळी पद्धतीने देताहेत ठिय्या

एटापल्ली/ गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे रस्ता व प्रस्तावित लोहखाणींना विरोध करत आदिवासींचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला २२ दिवस उलटले; पण अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आता परिसरातील ग्रामसभांनी साखळी पद्धतीने आंदोलन सुरू केले असून रोज एका गावचे लोक आंदोलनस्थळी ठिय्या देत आहेत. या आंदाेलनाचे काय हाेणार, याकडे लक्ष लागले आहे.

दमकोंडीवाही बचाव कृती समिती व पारंपरिक सूरजागड इलाका समितीच्या नेतृत्वाखाली तोडगट्टा येथे १३ मार्चपासून आंदोलन सुरू आहे. आदिवासी हेच जंगलांचे वैधानिक व कायदेशीर हक्कदार आहेत. त्यामुळे ग्रामसभेच्या मागणीनुसार कामे करावी, मागणीशिवाय होऊ घातलेली कामे बंद करावीत, असा निवेदनात उल्लेख आहे. दरम्यान, ३ एप्रिलला या आंदोलनास २२ दिवस झाले. अद्यापही आंदोलक ठाम आहेत. रमेश कवडो, सैनू गोटा, नितीन पदा, लक्ष्मन नवडी, प्रदीप हेडो, सैनू हिचामी, सुशील नरोटी, सविता कौशी, सुनीता कवडो, शीला गोटा यांच्यासह ग्रामसभेचे पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थ आंदोलनात सहभागी आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही

यासंदर्भात जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, हे आंदोलन विकासविरोधी आहे. आंदोलन बेकायदेशीर व विनापरवाना आहे. तेथे कायदा- सुव्यवस्था निर्माण होऊ नये, यासाठी काय करता येईल, याबाबत विचार सुरू आहे.

आंदोलनात आतापर्यंत काय?

- २६ मार्चला शहीद दिनानिमित्त आंदोलनस्थळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी छत्तीसगड ग्रामसभेचे लोकही उपस्थित होते.

- २७ मार्चनंतर मुखिया व गाव पाटील यांना आंदोलनात सहभागी होण्याची पत्रके मिळाली. ही पत्रके नक्षल्यांनी पाठविल्याचा पोलिसांना संशय आहे.

... म्हणून आदिवासींचा विरोध

सूरजागड येथील लोहखाणीमुळे प्रदूषणासह रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अवजड वाहनांमधून रात्रंदिवस वाहतूक सुरू असल्याने अपघात होत आहेत, त्यास स्थानिक आदिवासींचा विरोध आहे. ग्रामसभेच्या ठरावाशिवाय व अनुसूचित क्षेत्र असतानाही नव्याने सहा खाणी कशासाठी, असा सवाल आंदोलक उपस्थित करत आहेत.

संविधानाने ग्रामसभेला दिलेल्या अधिकाराचा भंग करून खाणींना मंजुरी देण्यासाठी रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे. त्याऐवजी शिक्षण व आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष का दिले जात नाही. प्रशासनाने अंत न पाहता तोडगा काढावा.

- सैनू गोटा, सूरजागड इलाका प्रमुख तथा माजी जि.प. सदस्य, गट्टा

टॅग्स :SocialसामाजिकagitationआंदोलनGadchiroliगडचिरोली