शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सामाजिक वनीकरण विभागातर्फे झाडे लावलीत पण आता जिवंत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:59 IST

नरोटी येथील प्रकार : ३०% रोपटी नष्ट झाल्याने लागवडीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क वडधा: वडसा वन विभागांतर्गत सामाजिक वनीकरण विभागातर्फे सिर्सी उपक्षेत्रातील नरोटी माल येथे रोजगार हमी योजनेतून दीड महिन्यापूर्वी १ हजार ३०० रोपटी लावण्यात आली. सदर झाडे पावसाळ्यात लावण्याऐवजी हिवाळ्यात लावून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. आता तर येथील ३० टक्के झाडे नष्ट झालेली आहेत. ७० टक्के झाडांपैकी काही झाडे मरतुकडी झालेली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाकडून ही मोहीम झाडे लावण्यासाठी राबविली की, निधीची विल्हेवाट लावण्यासाठी, असा सवाल डार्लीसह नरोटी माल येथील शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

वन विभाग किंवा सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाते. जास्तीत जास्त रोपटी जिवंत राहावीत, हा यामागील उद्देश असतो. परंतु नरोटी येथे एका मोकळ्या जागेवर पावसाळ्यात वृक्ष लागवड न करता दीड महिन्यापूर्वी म्हणजेच हिवाळ्यात १ हजार ३०० रोपट्यांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड करून सामाजिक वनीकरण विभागाने आपली जबाबदारी झटकली.

लागवडीची चौकशी करण्याची मागणी ही मोहीम वृक्ष संवर्धनाची नव्हे तर निधी मुरवण्यासाठी राबवलेली, तर नाही ना, असा सवाल नागरिकांचा आहे. येथील वृक्ष लागवडीची चौकशी करावी, अशी मागणी डार्लीसह नरोटी येथील नागरिकांनी केलेली आहे.

वृक्षलागवड कामात बोगस मजूर? वडधा परिसरात गत तीन वर्षांपासून सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्ष लागवड केली जात आहे. यात ५० टक्के मजूर प्रत्यक्ष काम करणारे तर ५० टक्के मजूर कामावर न येता त्यांच्या नावाने बँक खात्यात पैसा जमा करून निधी लाटला जातो. मजुरांकडून पैसा वनीकरणचे कर्मचारी मागून घेतात, असा आरोप आहे. 

टॅग्स :Plantsइनडोअर प्लाण्ट्सGadchiroliगडचिरोली