शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रानटी हत्तींचे अपडाऊन सुरूच! दिवसा गडचिरोली तर रात्री गोंदियात, वन विभाग त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 16:37 IST

दिवसभर रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात तर रात्र होताच सीमा ओलांडून गोंदिया जिल्ह्यात जात आहेत. हत्तींच्या या अपडाऊनमुळे वनकर्मचारी त्रस्त झाले आहेत.

गडचिरोली : गोंदिया जिल्ह्यात गेलेल्या रानटी हत्तींचा कळप पुन्हा गुरुवारला रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनविभागात दाखल झाला होता. येथे येताच हत्तींनी कुरखेडा वनपरिक्षेत्रातील चारभट्टी व सिंदेसूर गाव परिसरातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वनविभागाद्वारे रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चमू तयार करण्यात आली. मात्र आता हत्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात अपडाऊन करीत आहेत. दिवसभर रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात तर रात्र होताच सीमा ओलांडून गोंदिया जिल्ह्यात जात आहेत. हत्तींच्या या अपडाऊनमुळे वनकर्मचारी त्रस्त झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी रानटी हत्तींचा कळप छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला होता. येथे आल्यानंतर हत्तींनी गडचिरोली व वडसा वनविभागातील धानपीक तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. सर्वाधिक नुकसान वडसा वनविभागातील शेतकरी व नागरिकांचे झाले आहे. वडसा वनविभागात धुडगूस घातल्यानंतर रानटी हत्तींचा कळप नजीकच्या गोंदिया जिल्ह्यात पोहोचला. येथे जवळपास १५ दिवस राहिल्यानंतर गुरुवारला पुन्हा हत्तींचा कळप वडसा वनविभागातील कुरखेडा वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे.

कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी व सिंदेसूर गावातील धान पिकांचे हत्तींनी नुकसान केले. वनविभागाने सतर्क होत शुक्रवारला अधिकारी, वनकर्मचाऱ्यांची चमू गठित केली. गस्ती पथकासोबत ग्रामस्थही रात्रभर पहारा देत आहेत. मात्र रानटी हत्तींचा कळप एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात अपडाऊन करीत असल्याने वनविभागाचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :environmentपर्यावरणGadchiroliगडचिरोलीgondiya-acगोंदियाforest departmentवनविभाग