शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतून ठरणार ट्रिपल इंजिन सरकारच्या कारभाराची दिशा

By संजय तिपाले | Updated: July 8, 2023 10:51 IST

भूमिकेकडे लक्ष : सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री प्रथमच जनतेसमोर

संजय तिपाले

गडचिरोली : भाजप व शिवसेना (शिंदे गट) सरकारने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला सत्तेत सहभागी केल्याने राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलून गेली आहेत. सत्तानाट्यानंतर महाराजस्व अभियानासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार हे तिघेही दि. ८ जुलै रोजी येथे जनतेसमोर एकत्रित येत आहेत. त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकारच्या कारभाराची दिशा गडचिरोलीतून ठरणार आहे.

नागरिकांना विविध योजनांचा लाभ द्वारपोच देण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दुर्गम, मागास व शेवटच्या टोकावरील गडचिराेलीत जिल्हा प्रशासनाने या मोहिमेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. तब्बल सहा लाख ९७ हजार ६१९ नागरिकांना विविध योजना, प्रमाणपत्रांद्वारे लाभ दिला. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्हास्तरीय कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरातील एमआयडीसी मैदानावर दि. ८ जुलैला सकाळी ११ वाजता नियोजित कार्यक्रम होत आहे.

दि. २ जुलैला नाट्यमय घडामोडी घडल्या व अजित पवार सत्तेत सामील होऊन थेट उपमुख्यमंत्री झाले. धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार यांची साथ दिली. त्यामुळे बक्षिसी म्हणून त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नवे उपमुख्यमंत्री अजित पवार व कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे दि. ८ जुलै रोजीच्या नियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिनचे झाल्याची बोलकी प्रतिक्रिया दिली होती. नव्या सत्तासमीकरणानंतर सहाव्याच दिवशी राज्याचे कारभारी जिल्ह्यात येत आहेत. ते कोणती भूमिका घेऊन जनतेसमाेर येतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

गडचिरोलीकरांच्या आशा पल्लवित, सरकार काय देणार?

धर्मरावबाबा आत्राम यांना सत्तेत वाटा मिळाल्याने गडचिरोलीकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राज्याचे कारभारी जिल्ह्यासाठी काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

देसाईगंज ते गडचिरोली या ५१ किलोमीटरच्या रखडलेल्या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. दर्जेदार लोह, चूणखडी व इतर गौणखनिज उपलब्ध आहे, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात यावेत व स्थानिकांना रोजगार मिळावा, कोनसरी प्रकल्पामुळे परिसरातील दहा गावे विस्थापित होणार आहेत, तेथे प्रदूषण नियंत्रण करून स्थानिकांना रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा सुविधा द्याव्यात, दुर्गम-अतिदुर्गम भागात पूल, रस्ते करावेत व निसर्गाचे भरभरून दान लाभलेल्या व विविध पर्यटनस्थळे असलेल्या गडचिरोलीत पर्यटन विकासाला चालना द्यावी,

वन उपजावर आधारित रोजगारनिर्मितीसाठी कौशल्याधारित शिक्षण, आदिवासींचा कायापालट, दूरध्वनीचे जाळे निर्माण करावे, बांबूवर प्रक्रिया करून इथेनॉल निर्मिती, येन झाडांच्या सालीपासून ऑब्झीलिक ॲसिड निर्मिती, तेंदूपानांपासून पर्यावरणपूरक वस्तू निर्मितीही करता येईल.

टॅग्स :PoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारGadchiroliगडचिरोली