शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

दुरुस्तीनंतर तीन महिन्यांतच लागली चामोर्शी-भेंडाळा- मूल मार्गाची 'वाट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:50 IST

डांबरीकरण उखडले : जडवाहतूक पर्यायी मार्गाने वळती करण्याची आवश्यकता

लोकमत न्यूज नेटवर्क भेंडाळा: चामोर्शी तालुक्यातील हरणघाट ते चामोर्शी रस्ता चंद्रपूर, नागपूर तसेच इतरत्र कुठेही जाण्यासाठी वाहनधारकांना जवळचा आहे. मात्र हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून खड्डेमय झाला आहे. त्यासाठी या रस्त्याची नव्याने बांधणी करावी म्हणून शासनाकडे सतत मागणी केली जात होती. त्याची दखल घेत शासनाने रस्ता बांधकामाची मान्यता दिली आहे. आणि या एकूण १५ किमीच्या रस्त्यापैकी सात ते आठ किमीच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले. पण अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याचे अवघ्या तीन महिन्यांतच तीनतेरा वाजले. परिणामी वाहनचालकांना चामोर्शी-मूल मार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

अल्पावधीत सदर कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले की काय, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. दररोज शेकडो अति जडवाहने या रस्त्याने जात असल्याने हा संपूर्ण रस्ता फुटून गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली, पण या मार्गावरील जडवाहतूक बंद केली तरच हा रस्ता टिकेल अन्यथा नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात या मार्गावर काही काळ जडवाहतूक बंद होती, पण आता पूर्ववत सुरू झाली आहे. 

दररोज शेकडो ट्रक या रस्त्यावरून जात असतात, त्यामुळे या मार्गावरची जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळती करावी, अशी मागणी भेंडाळा परिसरातील वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.

कमरेसह मणक्याचे आजार वाढलेनागपूर, चंद्रपूर, अहेरी, सिरोंचा आदी ठिकाणी जाण्यासाठी तसेच मार्कंडा येथे भाविक धार्मिक विधीसाठी येत असतात. त्यामुळे हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या रस्त्यावर पदोपदी खड्डे असल्याने हे रस्ते प्रवाशांना गचके देत असतात. या रस्त्यावरून जात असताना धुळीचा सामना करावा लागत आहे. तसेच खट्टेमय रस्त्यातून प्रवास केल्यामुळे अनेकांना कमरेचे आजार, मणक्याचे आजार सुद्धा जडलेले आहेत.

कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्हचामोर्शी-भेंडाळा-मूल रस्ता खराब झाल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राट प्रशासनाच्या वतीने कंत्राटदाराला देण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने सदर रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र हे डांबरीकरण अल्पावधीत उखडले असून रस्त्यावर खड्डे पडले असून परिणामी सदर रस्ता डांबरीकरण कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यवेक्षिय यंत्रणा नेमकी काय करीत आहे, असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली सदर मार्गावरून जडवाहतुकीस मज्जाव / बंदी असेल. सदर वाहतूक पर्यायी मार्ग आष्टी, चामोर्शी, गडचिरोली मूल मार्गे करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात काढले होते. चामोर्शी येथील आष्टी टी पॉईंटवर मूल रस्त्यावर अशा सूचना देणारे फलक लावलेले आहेत. त्यावेळेस रस्त्याचे काम सुरू होते, म्हणून असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. पण हा आदेश पुढील आदेशापर्यंत असल्याने अजूनही या रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून अति जडवाहनांची सदर मार्गावरून वाहतूक सर्रास सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची या ठिकाणी पायमल्ली होताना दिसत आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा