शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोदाकाठच्या शेतीचे झाले वाळवंट.. ना पीक हाती आले, ना मिळाला मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 13:56 IST

अंकिसा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला वाळवंटाचे स्वरूप

महेश आगुला

अंकिसा (गडचिरोली) : यावर्षीच्या पावसाने, धरणांमधील पाण्याच्या विसर्गामुळे आणि तेलंगणा सरकारच्या मेडिगड्डा बॅरेजमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने सिरोंचा तालुक्यात हाहाकार उडाला. अनेक गावे आणि शेती जलमय झाली होती. पूर ओसरल्यानंतर शेतात पीक आणि माती गायब होऊन त्या ठिकाणी केवळ वाळू शिल्लक आहे. गेलेल्या पिकाचा किंवा खराब झालेल्या शेतजमिनीचा कोणताही मोबदला अद्याप या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बनविलेल्या मेडिगड्डा बॅरेजच्या ८५ गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुराचे पाणी अंकिसा परिसरातील अनेक गावांत शिरले होते. अनेकांना गाव सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. काठावरील शेकडो हेक्टर शेतात पुराचे पाणी शिरले होते. त्या पाण्यासाठी वाहून आलेली वाळू शेतात सर्वत्र पसरली आहे. अंकिसा परिसरातील १४ शेतकऱ्यांच्या शेतीला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. शेतात दोन ती तीन फूट वाळूचा थर जमा झाल्याने त्यांना सध्या कोणतेही पीक घेणे अशक्य झाले आहे.

महसूल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी शेतीचे पंचनामे करून ३ महिने झाले, पण शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. आम्ही आमच्या कुटुंबांचे पालनपोषण कसे करायचे? शेतकऱ्यांना लवकर मदत देऊन दिलासा द्यावा.

- श्रीनिवास गंजी, शेतकरी, अंकिसा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीGadchiroliगडचिरोलीriverनदी