शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

गोदाकाठच्या शेतीचे झाले वाळवंट.. ना पीक हाती आले, ना मिळाला मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 13:56 IST

अंकिसा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला वाळवंटाचे स्वरूप

महेश आगुला

अंकिसा (गडचिरोली) : यावर्षीच्या पावसाने, धरणांमधील पाण्याच्या विसर्गामुळे आणि तेलंगणा सरकारच्या मेडिगड्डा बॅरेजमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने सिरोंचा तालुक्यात हाहाकार उडाला. अनेक गावे आणि शेती जलमय झाली होती. पूर ओसरल्यानंतर शेतात पीक आणि माती गायब होऊन त्या ठिकाणी केवळ वाळू शिल्लक आहे. गेलेल्या पिकाचा किंवा खराब झालेल्या शेतजमिनीचा कोणताही मोबदला अद्याप या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बनविलेल्या मेडिगड्डा बॅरेजच्या ८५ गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुराचे पाणी अंकिसा परिसरातील अनेक गावांत शिरले होते. अनेकांना गाव सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. काठावरील शेकडो हेक्टर शेतात पुराचे पाणी शिरले होते. त्या पाण्यासाठी वाहून आलेली वाळू शेतात सर्वत्र पसरली आहे. अंकिसा परिसरातील १४ शेतकऱ्यांच्या शेतीला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. शेतात दोन ती तीन फूट वाळूचा थर जमा झाल्याने त्यांना सध्या कोणतेही पीक घेणे अशक्य झाले आहे.

महसूल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी शेतीचे पंचनामे करून ३ महिने झाले, पण शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. आम्ही आमच्या कुटुंबांचे पालनपोषण कसे करायचे? शेतकऱ्यांना लवकर मदत देऊन दिलासा द्यावा.

- श्रीनिवास गंजी, शेतकरी, अंकिसा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीGadchiroliगडचिरोलीriverनदी