शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

दहावी निकालात सरकार नापास, विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST

कोरोनामुळे दहावीचे सत्र २३ नोव्हेंबरला सुरू झाले. पुन्हा १५ फेब्रुवारीला वर्ग बंद करण्यात आले. अडीच महिनेच शाळा सुरू राहिली. ...

कोरोनामुळे दहावीचे सत्र २३ नोव्हेंबरला सुरू झाले. पुन्हा १५ फेब्रुवारीला वर्ग बंद करण्यात आले. अडीच महिनेच शाळा सुरू राहिली. त्यातही बस व वसतिगृह सुरू न केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत पोहोचू शकले नाही. अनेक पालकांनी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. आता परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन व नववीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन राहणार आहे. त्यात दोन प्रकार करण्यात आले आहे, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २० गुण राहणार असून गृहपाठ, सराव परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा मिळून ३० गुण राहणार आहेत. गेल्या वर्षी जे विद्यार्थी नववी पास झाले त्या निकालाच्या आधारावर ५० गुण आहेत. त्यातही गोंधळ म्हणजे विद्यार्थी व पालकांना मूल्यमापन पध्दत मान्य नसेल तर लेखी परीक्षा कोरोनानंतर घेण्यात येणार आहे. शंभरपैकी पाच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे. असे म्हटल्यास निकाल राखीव ठेवणार का, निकाल जाहीर केला नाही तर पुढची प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलणार का? या सत्रात अनेक विद्यार्थी शाळेतच येऊ शकले नाही तर अंतर्गत मूल्यमापन कसे करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याला पर्याय म्हणून ऑनलाइन वर्ग घेण्यात आल्याचे शासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात ऑनलाइन वर्गात नेटवर्कचा खोडा राहिलेला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल तसेच नेटवर्क ही समस्या राहिली आहे. शहरी भागातील श्रीमंत पालकांच्या मुलांना गृहीत पकडण्यात आले. यात ग्रामीण भागातील विद्यार्थांची नोंदच घेण्यात आली नाही. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या पिटीशनला उत्तर देण्यासाठी सरकारने आपली बाजू राखली तर नाही ना, अशी शंकादेखील कोहाडे यांनी उपस्थित केली आहे.