शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

दहावी निकालात सरकार नापास, विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST

कोरोनामुळे दहावीचे सत्र २३ नोव्हेंबरला सुरू झाले. पुन्हा १५ फेब्रुवारीला वर्ग बंद करण्यात आले. अडीच महिनेच शाळा सुरू राहिली. ...

कोरोनामुळे दहावीचे सत्र २३ नोव्हेंबरला सुरू झाले. पुन्हा १५ फेब्रुवारीला वर्ग बंद करण्यात आले. अडीच महिनेच शाळा सुरू राहिली. त्यातही बस व वसतिगृह सुरू न केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत पोहोचू शकले नाही. अनेक पालकांनी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. आता परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन व नववीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन राहणार आहे. त्यात दोन प्रकार करण्यात आले आहे, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २० गुण राहणार असून गृहपाठ, सराव परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा मिळून ३० गुण राहणार आहेत. गेल्या वर्षी जे विद्यार्थी नववी पास झाले त्या निकालाच्या आधारावर ५० गुण आहेत. त्यातही गोंधळ म्हणजे विद्यार्थी व पालकांना मूल्यमापन पध्दत मान्य नसेल तर लेखी परीक्षा कोरोनानंतर घेण्यात येणार आहे. शंभरपैकी पाच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे. असे म्हटल्यास निकाल राखीव ठेवणार का, निकाल जाहीर केला नाही तर पुढची प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलणार का? या सत्रात अनेक विद्यार्थी शाळेतच येऊ शकले नाही तर अंतर्गत मूल्यमापन कसे करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याला पर्याय म्हणून ऑनलाइन वर्ग घेण्यात आल्याचे शासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात ऑनलाइन वर्गात नेटवर्कचा खोडा राहिलेला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल तसेच नेटवर्क ही समस्या राहिली आहे. शहरी भागातील श्रीमंत पालकांच्या मुलांना गृहीत पकडण्यात आले. यात ग्रामीण भागातील विद्यार्थांची नोंदच घेण्यात आली नाही. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या पिटीशनला उत्तर देण्यासाठी सरकारने आपली बाजू राखली तर नाही ना, अशी शंकादेखील कोहाडे यांनी उपस्थित केली आहे.