शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

दहावी निकालात सरकार नापास, विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST

कोरोनामुळे दहावीचे सत्र २३ नोव्हेंबरला सुरू झाले. पुन्हा १५ फेब्रुवारीला वर्ग बंद करण्यात आले. अडीच महिनेच शाळा सुरू राहिली. ...

कोरोनामुळे दहावीचे सत्र २३ नोव्हेंबरला सुरू झाले. पुन्हा १५ फेब्रुवारीला वर्ग बंद करण्यात आले. अडीच महिनेच शाळा सुरू राहिली. त्यातही बस व वसतिगृह सुरू न केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत पोहोचू शकले नाही. अनेक पालकांनी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. आता परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन व नववीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन राहणार आहे. त्यात दोन प्रकार करण्यात आले आहे, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २० गुण राहणार असून गृहपाठ, सराव परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा मिळून ३० गुण राहणार आहेत. गेल्या वर्षी जे विद्यार्थी नववी पास झाले त्या निकालाच्या आधारावर ५० गुण आहेत. त्यातही गोंधळ म्हणजे विद्यार्थी व पालकांना मूल्यमापन पध्दत मान्य नसेल तर लेखी परीक्षा कोरोनानंतर घेण्यात येणार आहे. शंभरपैकी पाच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे. असे म्हटल्यास निकाल राखीव ठेवणार का, निकाल जाहीर केला नाही तर पुढची प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलणार का? या सत्रात अनेक विद्यार्थी शाळेतच येऊ शकले नाही तर अंतर्गत मूल्यमापन कसे करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याला पर्याय म्हणून ऑनलाइन वर्ग घेण्यात आल्याचे शासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात ऑनलाइन वर्गात नेटवर्कचा खोडा राहिलेला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल तसेच नेटवर्क ही समस्या राहिली आहे. शहरी भागातील श्रीमंत पालकांच्या मुलांना गृहीत पकडण्यात आले. यात ग्रामीण भागातील विद्यार्थांची नोंदच घेण्यात आली नाही. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या पिटीशनला उत्तर देण्यासाठी सरकारने आपली बाजू राखली तर नाही ना, अशी शंकादेखील कोहाडे यांनी उपस्थित केली आहे.