शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

जिल्ह्याचे तापमान ४५ अंशाच्या वर

By admin | Updated: June 2, 2014 01:13 IST

मागील पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली ...

गडचिरोली : मागील पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून यामुळे घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. उन्हामध्ये काम करणार्‍या उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे.

२५ मे पासून नवतपांना सुरूवात होते. या कालावधीत संपूर्ण राज्याच्या तापमानात कमालीची वाढ होत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळेच या कालावधीला राज्यात नवतपामुळे ओळखले जाते. ताममानामध्ये झालेली वाढ मान्सुनच्या आगमनापर्यंत कायम राहते. दरवर्षीच्या अनुभवाची यावर्षीही पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी ११ नंतर घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. दिवसभर वाहन व नागरिकांनी फुलून दिसणारे रस्ते आता दुपारच्या सुमारास निर्मनुष्य व्हायला लागले आहेत. या कालावधीत ग्रामीण भागात हंगामपूर्व शेतीची कामे केली जात आहेत. मात्र वाढलेल्या तापमानामुळे दिवसभर काम करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे मजुरही सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंतच काम करण्यास तयार होत आहेत. मजूर मिळत नसल्याने एवढय़ा कामासाठीही दिवसभराची मजूरी मोजावी लागत आहे. वाढलेल्या तापमानाचा पारा मान्सुनचे आगमन होईपर्यंत कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. (नगर प्रतिनिधी)