शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

गरंजीच्या विकासदूतास आदिवासींचा अनोखा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 17:23 IST

पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडीचे रहिवासी असलेल्या विजय कारखेले या तरुण शिक्षकाने तब्बल १४ वर्षे गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करताना गावक-यांना दाखविलेली विकासाची दिशा गावक-यांसाठी अविस्मरणीय ठरली आहे.

- पांडुरंग कांबळेगडचिरोली- अलिकडे शिक्षकी पेशात सेवाभाव कमी आणि व्यवहारिकपणा जास्त आल्याचे म्हटले जाते. पण अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडीचे रहिवासी असलेल्या विजय कारखेले या तरुण शिक्षकाने तब्बल १४ वर्षे गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करताना गावक-यांना दाखविलेली विकासाची दिशा गावक-यांसाठी अविस्मरणीय ठरली आहे. आंतरजिल्हा बदलीतून त्यांची आता पुणे जिल्ह्यात बदली झाली. यानिमित्त गावाच्या या विकासदूताला आदिवासी गावक-यांनी अनोख्या पद्धतीने वाजतगाजत निरोप देऊन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवेची आगळी भेट त्यांना दिली.जिल्ह्याच्या अविकसित मुलचेरा तालुक्यातील गरंजी हे गाव म्हणजे अतिदुर्गम क्षेत्र. गावाची लोकसंख्या जेमतेम अडीचशे. गावात पहिली ते चौथीपर्यंतची शाळा, पण गावात वीज नाही, जाण्यासाठी व्यवस्थित रस्ताही नाही अशी स्थिती होती. शिक्षकी पेशाची सुरुवातीची चार वर्षे गडचिरोली जिल्ह्यातल्या गोविंदपूर गावात गेल्यानंतर २००८ मध्ये विजय कारखेले यांची बदली गरंजी या गावात झाली आणि त्यांनी तेथील परिस्थिती पाहून गावाच्या विकासाचा विडाच उचलला. सर्वप्रथम गावात वीज पुरवठा येण्यासाठी गावक-यांना घेऊन महावितरण कार्यालयाकडे पाठपुरावा केला आणि गावक-यांना पहिल्यांदा रात्रीचा प्रकाश पाहिला. गावक-यांना स्वखर्चाने गॅस सिलिंडर घेण्यासाठी प्रवृत्त केले. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी गावक-यांना जातीचे दाखले काढून दिले. पावसाळ्यात गावात प्रवेश करणे कठीण जात होते. त्यासाठी श्रमदानातून रस्ता दुरुस्त केला. विडी, तंबाखू, दारू गावातून हद्दपार करून गावाला १०० टक्के नशामुक्त केले. आधी राखी वृक्षाला या उपक्रमातून वृद्ध संवर्धनाचे महत्व गावक-यांना पटवून दिले. अशा विविध कामांमुळे कारखेले हे त्या गावासाठी विकासदूतच झाले होते. त्यांची बदली झाल्याचे समजताच संपूर्ण गावकरी भावुक झाले. गावावर केलेल्या उपकाराची आठवण ठेवून रविवारी (दि.२७) गावातल्या गोटूल भवनात कार्यक्रम घेण्याचे ठरले. आदिवासी ढोल, पारंपरिक नृत्य पथक व गावातील महिला-मुलींनी आदिवासी पद्धतीने नृत्य सादर करत जिल्हा परिषद शाळा ते गोटूल भवन अशी त्यांची मिरवणूक काढली. यावेळी गावात रांगोळ्या काढून घरोघरी मुख्याध्यापक विजय कारखेले यांना निरोप दिला जात होता. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. गावक-यांच्या व महीला बचत गटाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन कारखेले यांना निरोप देण्यात आला. या सोहळ्यासाठी केंद्र प्रमुख शरद बावणे, गट समन्वयक अमर पालारपवार, लालाजी हिचामी, तुकाराम पुंगाटी, किशोर हिचामी, शिक्षक रवींद्र मरस्कोल्हे, संदीप कुळमेथे, तुकाराम कंगाली,सुधाकर हिचामी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.भविष्यातही गरंजीसाठी धावून येणारया सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक कारखेले म्हणाले, अतिदुर्गम गरंजी गावातील आदीवासी बांधवांच्या सन्मानाने मी भारावलो. गरंजीशी आपले नाते अतुट असून जेव्हा गावाला गरज असेल तेव्हा या गावासाठी हजर होईल. पुणे, मुंबई येथील दानशूर संस्थांच्या माध्यमातून मानवसेतू निर्माण करून भविष्यात गरंजीच्या विकासाकरिता प्रयत्न करीत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.