शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं.वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, प्राचार्य डॉ.राजेंद्र घोनमोडे, प्रा.शशिकांत गेडाम आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देपरिवहन अधिकारी रवींद्र भुयार : आरमोरीत रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : वाहनचालकाने स्वत:च्या सुरक्षिततेपेक्षा दुसºयाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली तर अपघात टळतील. त्यासाठी वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले.स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं.वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, प्राचार्य डॉ.राजेंद्र घोनमोडे, प्रा.शशिकांत गेडाम आदी उपस्थित होते.पुढे बोलताना भुयार म्हणाले, मानवी वृत्तीत चांगले आचार घडून येण्यासाठी मनात प्रथम चांगले विचार निर्माण होणे आवश्यक आहे. आजचा तरुण विद्यार्थी मुळातच सद्विचारी आहे. परंतु कुणीतरी मार्इंड हायजॅक करून त्याचा स्वार्थासाठी वापर करीत आहे. एक बीज ज्याप्रमाणे जमिनीत स्वत:ला नष्ट करवून घेते. परंतु त्याच बिजापासून येणाºया रोपट्यातून हजारो बीज जन्म घेतात, ही सृजनतेची भावना निर्माण झाली आणि दुसऱ्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली तर अपघात टळण्यास मदत होईल, असे मौलिक मार्गदर्शन भुयार यांनी केले.यावेळी प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा म्हणाले, नागरिकांना केवळ रस्ता सुरक्षेचे नियम माहित असणे आवश्यक असून चालणार नाही. तर त्या नियमांचे तंतोतंत पालन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तरुणांनी इतरांच्या जगण्याचे मूल्य समजून घेतल्यास रस्ता सुरक्षेचे प्रश्न सहज सुटू शकतील, असे खालसा यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षाविषयक विविध प्रश्न आरटीओ रवींद्र भुयार यांना विचारले. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.प्रास्ताविक प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, संचालन डॉ.विजय रैवतकर यांनी केले तर आभार प्रा.शशिकांत गेडाम यांनी मानले.यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत घोनमोडे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षा