शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

कडू कारले शेतकऱ्यांना देताहेत आर्थिक समृद्धीचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:22 IST

कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडूच! अशी म्हण प्रसिद्ध आहे. आशिया, आफ्रिका, उष्ण कटिबंध प्रदेशात घेतले जाणारे वेलवर्गीय पिक आहे. देसाईगंज तालुक्यातील तुळशी, किन्हाळा, मोहटोला, अरततोंडी, पोटगाव, विहिरगाव, चिखली, डोंगरगाव, कुरुड, नैनपूर, विसोरा, एकलपूर येथे मोठ्या प्रमाणात कारल्याचे उत्पादन घेतले जात असून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक प्राप्ती होत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । एकरी अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न; देसाईगंजवरून नागपूरच्या बाजारपेठेत जाताहेत कारले

विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडूच! अशी म्हण प्रसिद्ध आहे. आशिया, आफ्रिका, उष्ण कटिबंध प्रदेशात घेतले जाणारे वेलवर्गीय पिक आहे. देसाईगंज तालुक्यातील तुळशी, किन्हाळा, मोहटोला, अरततोंडी, पोटगाव, विहिरगाव, चिखली, डोंगरगाव, कुरुड, नैनपूर, विसोरा, एकलपूर येथे मोठ्या प्रमाणात कारल्याचे उत्पादन घेतले जात असून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक प्राप्ती होत आहे. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळले असून कडू कारले शेतकºयांना आर्थिक समृध्दीचा गोडवा देत असल्याचे चित्र आहे.धानाच्या पिकासाठी उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात लागत असते. त्या तुलनेने फायदा अत्यल्प होत असल्याने देसाईगंज तालुक्यातील शेतकरी वर्ग भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याकडे वळले आहेत. त्यात कारले उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहे. कारले पिकासाठी धान पिकापेक्षा कमी पाणी, कमी उत्पादन खर्च लागत असल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊन आर्थिक समृध्दी येत आहे. एक एकर शेतीतून अडीच ते तीन लाख रूपयाचे उत्पन्न प्राप्त होत आहे.यासाठी व्हीएनआर या जातीच्या कारलेची लागवड केल्या जात आहे. कारल्यासाठी नागपूरला मोठी बाजारपेठ असून देसाईगंज येथून दररोज देसाईगंज परिसरातील शेतकरी नागपूर येथे कारले पाठवतात. हे कारले नागपूरचे व्यापारी विदेशात पाठवतात. त्यामुळे कारल्यांना चांगला भाव मिळत आहे. यावर्षी शेतकºयांना ३५ रुपयापासून २५ रुपयापर्यंत प्रती किलो भाव मिळाल्याने शेतकºयांना आर्थिक फायदा मिळत आहे. तुळशी येथील शेतकरी मोरेश्वर दुनेदार, सोमेश्वर सुकारे होमराज कुत्तरमारे, सोमेश्वर दुनेदार, भाष्कर मारबते, अंबरनाथ दुनेदार, भाष्कर तोंडफोडे, मुरलीधर दुनेदार, गुलाब तोंडफोडे, दिनकर सुकारे, हिरालाल तोंडफोडे, गिरीधर सुकारे, प्रकाश पत्रे, नेताजी सुकारे, देवराव सुकारे, देवदास ठाकरे, मदन सुकारे, मेघराज सुकारे, हिरामण ठाकरे, कविश्वर दुनेदार, काशीनाथ ठाकरे, मोहन दुनेदार, राकेश ढोरे, श्रीराम लोणारे, बबन पत्रे यांनी यावर्षी कारले पिकाची लागवड केली.वांगे व टमाटरचेही भरघोस उत्पादनदेसाईगंज तालुक्याच्या तुळशी, कोकडी परिसरात अनेक शेतकºयांनी सिंचन विहीर, मोटारपंपची व्यवस्था केल्याने दुबार पीक अनेक शेतकरी घेत आहेत. सिंचन सुविधा निर्माण झाल्यामुळे या भागात अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. प्रामुख्याने टमाटर, वांगे यांच्यासह पालेभाज्यांचेही उत्पादन येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती