शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

१७३४ रुग्णांवर शस्त्रक्रिया

By admin | Updated: February 4, 2015 23:14 IST

गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करून मिळावी, यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली असून या योजनेचा आजपर्यंत गडचिरोली

गडचिरोली : गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करून मिळावी, यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली असून या योजनेचा आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ७३४ नागरिकांनी लाभ घेतला आहे. अनेक रोगांवर शासकीय रुग्णालयातही उपचार केले जातात. मात्र या रुग्णालयांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णावर उपचार न करता डॉक्टर स्वत:चे खासगी दवाखाने सांभाळण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे सामान्य जनतेचे या रुग्णालयामध्ये हाल होतात. त्याचबरोबर काही रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार करण्याऐवजी मरणेही पसंत करतात. सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळावा, यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. ही योजना सर्वप्रथम गडचिरोलीसह काही निवडक जिल्ह्यांमध्येच सुरू करण्यात आली. त्यानंतर ती संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक नागरिकांकडू आरोग्य कार्डसुद्धा काढण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात जीवनदायी आरोग्य योजनेचे केंद्र स्थापन करण्यात आले असून या ठिकाणी आरोग्यमित्र कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर आरोग्यमित्र सदर रुग्णाला योग्य मार्गदर्शन करून त्याला जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून देतात. योजनेच्या सुरूवातीपासून गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ७३४ रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ज्या शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपयांचा खर्च येत होता. ती शस्त्रक्रिया आता खासगी रुग्णालयात मोफत झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने हे नागरिक खासगी रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे सरकारी दवाखान्याच्या आधाराशिवाय या नागरिकांना पर्याय राहत नव्हता. राजीव गांधी जीवनदायी योजनेने मात्र खासगी रुग्णालयांचे द्वार गरीबांसाठी मोकळे करून दिले आहे. त्याचबरोबर तालुकास्थळावरील आरोग्यमित्रही योग्य सहकार्य करीत आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यापूर्वी आरोग्य कार्ड असलेल्या व्यक्तिलाच या योजनेचा लाभ दिला जात होता. मात्र यामध्ये शिथीलता देत केसरी व पिवळ्या रेशनकार्डावर नाव असले तरी या योजनेचा लाभ दिला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयातच या योजनेंतर्गत लाभ दिला जातो. इतर रुग्ण वर्धा येथील रुग्णालयामध्ये पाठविले जातात. जिल्ह्यात रुग्णालयांची संख्या वाढवावी, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)