शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

उन्हाळ्यात खिरनी झाडाच्या फांद्या देतात गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

गृहप्रवेश असो की लग्नकार्य, यात खिरनीच्या फांद्यांचा मंडप आवर्जुन ग्रामीण भागात टाकल्या जाते. उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल, मे महिन्यात प्रचंड तापमान असल्याने नागरिक हैैराण होतात. त्यातल्या त्यात गृहप्रवेश किंवा लग्नकार्य म्हटले की, आप्तेष्ठांची गर्दी आपसुकच जमते. एकाच ठिकाणी शेकडो नागरिक गोळा होत असल्याने वाढत्या तापमानाचा अधिकच त्रास होतो. अशावेळी नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघतात.

ठळक मुद्देधार्मिक व इतर महत्त्वाच्या कार्यात झाडाला विशेष महत्त्व, ग्रामीण भागात मंडप टाकण्याची क्रेझ कायम

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : हिंदू धर्मात विविध शुभकार्य तसेच आणि महत्त्वाच्या कार्यात खिरनी वृक्षाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. खिरनी वृक्षाचे पान उन्हाळ्याच्या दिवसात माणसाला थंडावा देतात. त्यामुळे ही परंपरा सिरोंचा तालुक्यात आजही कायम आहे.गृहप्रवेश असो की लग्नकार्य, यात खिरनीच्या फांद्यांचा मंडप आवर्जुन ग्रामीण भागात टाकल्या जाते. उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल, मे महिन्यात प्रचंड तापमान असल्याने नागरिक हैैराण होतात. त्यातल्या त्यात गृहप्रवेश किंवा लग्नकार्य म्हटले की, आप्तेष्ठांची गर्दी आपसुकच जमते. एकाच ठिकाणी शेकडो नागरिक गोळा होत असल्याने वाढत्या तापमानाचा अधिकच त्रास होतो. अशावेळी नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघतात. या प्रचंड तापमानापासून दिलास मिळविण्याकरिता खिरनी झाडाच्या फाद्यांपासून टाकलेला मंडप उपयुक्त ठरतो. मंडप टाकण्यापासून लग्नकार्याच्या विधीला सुरूवात होते. मंडपपूजन ते देवपूजापासून विवाहविधी त्यानंतर भोजनावळी असा हा कार्यक्रम असतो. ग्रामीण भागातील लग्नकार्य म्हटले की आप्तेष्ठ व पाहुण्यांची रेलचेल असते. ज्या घरी लग्नकार्य आहे, त्या घरी चार दिवसांपूर्वी मंडप टाकून त्याचे पूजन केले जाते. सिरोंचा तालुकालगतच्या तेलंगणा राज्यातही ही परंपरा कायम आहे.तेलंगणामध्ये खिरनी झाडाला ‘पालापोरका’ म्हणतात. सदर पालापोरका म्हणजे खिरनी झाडाच्या फांद्या आणण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक बैलबंडीचा वापर करतात. शेजारच्या नागरिकांना घेऊन जंगलात जाऊन खिरनी झाडाच्या फांद्या जमा केल्या जातात.कोरोनाने पारंपरिक मंडप दिसेनाग्रामीण भागात बऱ्याच युवक, युवतींचे विवाह जुळले आहे. मात्र कोरोनाच्या संचारबंदीने नियोजित लग्नकार्य पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षी एप्रिल महिन्यात झाडांच्या फाद्यांपासून टाकल्या जाणारे पारंपरिक मंडप यावर्षी दिसेनासे झाले आहेत. डेकोरेशनाच्या माध्यमातून कापडाचा मंडप टाकल्या जातो. मात्र मुख्य विधी होणाऱ्या जागेवर पारंपरिकच मंडप असतो.फळ बहुगुणीखिरनी वृक्षाचे फळ चवीला गोळ असतात. सदर फळ पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होतात. किसमिससारखा या फळाचा आकार असतो. फळामध्ये दुधाची मात्रा अधिक असते. त्यामुळे या फळाला कॅल्शीयमचा स्त्रोत मानले जाते. हे फळ ग्रिष्म ऋतुत मिळतात. या फळाला मागणी सुद्धा चांगली असते. तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोक जंगलात जाऊन शहरात हे फळे विकायला आणतात. यातून आदिवासी नागरिकांना रोजगार मिळत असतो. खिरनी वृक्षाचे पान आठ ते दहा दिवस वाळत नाही. त्यामुळेच अधिक थंडावा मिळत असतो.