शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:27 IST

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केल्यानंतर अनेक महिने आणि वर्षाचा कालावधी होऊनही पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.

ठळक मुद्देकृषी महाविद्यालय : समितीमुळे नाहक मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केल्यानंतर अनेक महिने आणि वर्षाचा कालावधी होऊनही पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना हे पडताळणी प्रमाणपत्र आणल्याशिवाय द्वितीय वर्षाला प्रवेश नाकारल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.माना जमातीच्या काही विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आपली ही व्यथा बुधवारी पत्रपरिषदेतून व्यक्त केली. गेल्या शैक्षणिक सत्रात एमबीबीएसच्या प्रवेशासाठी सहा विद्यार्थ्यांनी वेळेत प्रमाणपत्र मिळावे म्हणून समितीकडे विनवणी केली. परंतू समितीने दोन वेळा त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविले. याविरूद्ध त्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरविण्यात आले. मात्र यात एक वर्ष उलटून गेल्याने त्यांचे ते वर्ष वाया गेले. आता कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. नितल प्रभाकर ढोल, प्रणाली गुणवंत जांभुळे, रुचिका टेमदेव वाघमारे, सरिता प्रभाकर चौधरी, पायल रामदास गायकवाड, प्रगती घनश्याम चौधरी आणि भूषण हरडे या सात विद्यार्थ्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला. मात्र त्यांना १० दिवसांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले. त्यांनी पडताळणी समितीकडून अद्याप प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे सांगितले, मात्र प्रमाणपत्र नसेल तर प्रवेश मिळणार नाही असे सांगितल्याने त्यांच्यावर शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मागे ठेवण्यासाठी तर अशा जाचक अटींची सक्ती केली जात नाही ना? असा उद्विग्न सवाल एका पालकाने उपस्थित केला.पडताळणी समिती माना जमातीच्या लोकांना लवकर प्रमाणपत्र देत नाही, दिले तरी ते अवैध ठरविते. पण अशा प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर तेच प्रमाणपत्र वैध ठरविले जाते. या खेळखंडोब्यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या अन्यायाला वाचा फोडून न्याय द्यावा, अशी मागणी सदर विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रagricultureशेती