शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
3
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
4
अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
5
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
6
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
7
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
8
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
9
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
10
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
11
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
12
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
13
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
14
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
15
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
16
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
17
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
18
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

पथदिवे दुरूस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

पावसाळ्यात पथदिव्यांची कीट खराब झाल्याने १७ वार्डातील बरेचशे पथदिवे बंद पडले आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना अंधाराचा सामाना करावा लागत होता. नगर पंचायत प्रशसानाने तातडीने पथदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत होती.

ठळक मुद्देनगर पंचायत प्रशासन कामाला भिडले : पावसाने कीट खराब झाल्याने अंधार

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची शहरातील संपूर्ण १७ वार्डातील काही खांबावरील पथदिवे बंद पडल्याने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर व चौकात अंधार राहत होता. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शनिवारपासून पथदिवे दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.पावसाळ्यात पथदिव्यांची कीट खराब झाल्याने १७ वार्डातील बरेचशे पथदिवे बंद पडले आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना अंधाराचा सामाना करावा लागत होता. नगर पंचायत प्रशसानाने तातडीने पथदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत होती. या मागणीची दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाने गेल्या तीन दिवसांपासून पथदिवे दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. तीन दिवसात १३ खांबावरील पथदिवे बदलविण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी नगर पंचायतीच्या वतीने पथदिवे लावण्यात आले होते. मात्र पावसामुळे दिव्यामधील कीट खराब झाल्याने पथदिवे बंद पडले. अनेक दिवस नादुरूस्त स्थितीत राहिले. नगर पंचायत प्रशासनाला शहर व तालुक्यात कोणत्याच दुकानदाराकडे दिव्यांची कीट उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पथदिवे दुरूस्तीच्या कामास विललंब झाला. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिल्हा व राज्य प्रवास बंदी असल्याने पथदिवे व त्याची कीट दुसऱ्या जिल्ह्यातून आणणे शक्य झाले नाही. आता कोरोनाचा लॉकडाऊन शिथील झाल्यावर नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील दुकानदारांकडून पथदिव्याची कीट बोलविण्यात आली. त्यानंतर बंद पथदिवे असलेल्या खांबावर नवीन पथदिवे लावण्याचे काम नगर पंचायतच्या वीज विभागाचे कर्मचारी रवी मडावी व त्यांचे सहकारी करीत आहेत. विद्युत खांबावर चढून दिवसभर कर्मचारी बंद पडलेले पथदिवे बदलवून त्या ठिकाणी नवीन पथदिवे लावत आहेत. या कामामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले.कोरोना लॉकडाऊनमुळे पथदिवे लावण्यास विलंब४पावसाळ्यात साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात नगर पंचायतीने शहरातील सर्व पथदिवे सुरळीत ठेवणे आवश्यक होते. पथदिवे बंद पडूनही त्याची दुरूस्ती अनेक दिवस झाले नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे नवीन पथदिवे उपलब्ध न झाल्याने ते बदलविण्यास विलंब झाला.