शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पथदिवे दुरूस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

पावसाळ्यात पथदिव्यांची कीट खराब झाल्याने १७ वार्डातील बरेचशे पथदिवे बंद पडले आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना अंधाराचा सामाना करावा लागत होता. नगर पंचायत प्रशसानाने तातडीने पथदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत होती.

ठळक मुद्देनगर पंचायत प्रशासन कामाला भिडले : पावसाने कीट खराब झाल्याने अंधार

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची शहरातील संपूर्ण १७ वार्डातील काही खांबावरील पथदिवे बंद पडल्याने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर व चौकात अंधार राहत होता. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शनिवारपासून पथदिवे दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.पावसाळ्यात पथदिव्यांची कीट खराब झाल्याने १७ वार्डातील बरेचशे पथदिवे बंद पडले आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना अंधाराचा सामाना करावा लागत होता. नगर पंचायत प्रशसानाने तातडीने पथदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत होती. या मागणीची दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाने गेल्या तीन दिवसांपासून पथदिवे दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. तीन दिवसात १३ खांबावरील पथदिवे बदलविण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी नगर पंचायतीच्या वतीने पथदिवे लावण्यात आले होते. मात्र पावसामुळे दिव्यामधील कीट खराब झाल्याने पथदिवे बंद पडले. अनेक दिवस नादुरूस्त स्थितीत राहिले. नगर पंचायत प्रशासनाला शहर व तालुक्यात कोणत्याच दुकानदाराकडे दिव्यांची कीट उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पथदिवे दुरूस्तीच्या कामास विललंब झाला. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिल्हा व राज्य प्रवास बंदी असल्याने पथदिवे व त्याची कीट दुसऱ्या जिल्ह्यातून आणणे शक्य झाले नाही. आता कोरोनाचा लॉकडाऊन शिथील झाल्यावर नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील दुकानदारांकडून पथदिव्याची कीट बोलविण्यात आली. त्यानंतर बंद पथदिवे असलेल्या खांबावर नवीन पथदिवे लावण्याचे काम नगर पंचायतच्या वीज विभागाचे कर्मचारी रवी मडावी व त्यांचे सहकारी करीत आहेत. विद्युत खांबावर चढून दिवसभर कर्मचारी बंद पडलेले पथदिवे बदलवून त्या ठिकाणी नवीन पथदिवे लावत आहेत. या कामामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले.कोरोना लॉकडाऊनमुळे पथदिवे लावण्यास विलंब४पावसाळ्यात साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात नगर पंचायतीने शहरातील सर्व पथदिवे सुरळीत ठेवणे आवश्यक होते. पथदिवे बंद पडूनही त्याची दुरूस्ती अनेक दिवस झाले नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे नवीन पथदिवे उपलब्ध न झाल्याने ते बदलविण्यास विलंब झाला.