शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

पथदिवे दुरूस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

पावसाळ्यात पथदिव्यांची कीट खराब झाल्याने १७ वार्डातील बरेचशे पथदिवे बंद पडले आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना अंधाराचा सामाना करावा लागत होता. नगर पंचायत प्रशसानाने तातडीने पथदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत होती.

ठळक मुद्देनगर पंचायत प्रशासन कामाला भिडले : पावसाने कीट खराब झाल्याने अंधार

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची शहरातील संपूर्ण १७ वार्डातील काही खांबावरील पथदिवे बंद पडल्याने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर व चौकात अंधार राहत होता. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शनिवारपासून पथदिवे दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.पावसाळ्यात पथदिव्यांची कीट खराब झाल्याने १७ वार्डातील बरेचशे पथदिवे बंद पडले आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना अंधाराचा सामाना करावा लागत होता. नगर पंचायत प्रशसानाने तातडीने पथदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत होती. या मागणीची दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाने गेल्या तीन दिवसांपासून पथदिवे दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. तीन दिवसात १३ खांबावरील पथदिवे बदलविण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी नगर पंचायतीच्या वतीने पथदिवे लावण्यात आले होते. मात्र पावसामुळे दिव्यामधील कीट खराब झाल्याने पथदिवे बंद पडले. अनेक दिवस नादुरूस्त स्थितीत राहिले. नगर पंचायत प्रशासनाला शहर व तालुक्यात कोणत्याच दुकानदाराकडे दिव्यांची कीट उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पथदिवे दुरूस्तीच्या कामास विललंब झाला. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिल्हा व राज्य प्रवास बंदी असल्याने पथदिवे व त्याची कीट दुसऱ्या जिल्ह्यातून आणणे शक्य झाले नाही. आता कोरोनाचा लॉकडाऊन शिथील झाल्यावर नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील दुकानदारांकडून पथदिव्याची कीट बोलविण्यात आली. त्यानंतर बंद पथदिवे असलेल्या खांबावर नवीन पथदिवे लावण्याचे काम नगर पंचायतच्या वीज विभागाचे कर्मचारी रवी मडावी व त्यांचे सहकारी करीत आहेत. विद्युत खांबावर चढून दिवसभर कर्मचारी बंद पडलेले पथदिवे बदलवून त्या ठिकाणी नवीन पथदिवे लावत आहेत. या कामामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले.कोरोना लॉकडाऊनमुळे पथदिवे लावण्यास विलंब४पावसाळ्यात साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात नगर पंचायतीने शहरातील सर्व पथदिवे सुरळीत ठेवणे आवश्यक होते. पथदिवे बंद पडूनही त्याची दुरूस्ती अनेक दिवस झाले नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे नवीन पथदिवे उपलब्ध न झाल्याने ते बदलविण्यास विलंब झाला.