शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

झिंगानूर-सिरकोंडा मार्गावरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:11 PM

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

ठळक मुद्देचिखलाचे साम्राज्य : पुलाच्या बाजूवरील कच्चा मुरूम वाहून गेला

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर झिंगानूर गावानजीक एक नाला आहे. या नाल्याची उंची वाढविण्यासाठीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, या उद्देशाने पुलाच्या लगत कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर कच्च्या रस्ता मुरूम टाकून तयार करण्यात आला. मृग व आद्रा नक्षत्राच्या सुरूवातीच्या पावसाने हा मुरूम व्यवस्थित बसला. मात्र त्यानंतर १६ जुलै रोजी गडचिरोली शहरसह सिरोंचा व अहेरी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. या पावसादरम्यान पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावर टाकलेला मुरूम वाहून गेला. त्यामुळे आता या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरील चिखलात फसत आहेत. मात्र त्यानंतर स्थानिक प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने सदर मार्गावर गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला नाही. चिखलमय झालेल्या या रस्त्यावर तत्काळ मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरात अनेक ठिकाणी नाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील मोठ्या नद्यांना पूर येते. नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर नाल्यावरही पाणी चढते. त्यामुळे या भागातील वाहतूक मुसळधार पावसादरम्यान अनेकदा खंडीत होते. शासन व प्रशासनाच्या वतीने या संदर्भात अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने झिंगानूर परिसरातील नागरिकांना आवागमनासाठी मोठी कसरत करावी लागते.अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा कायमएटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा व अहेरी या आदी पाच तालुके अहेरी उपविभागात मोडतात. गडचिरोली जिल्हा निर्मितीला ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा अद्यापही कायम आहे. एटापल्ली तालुक्यातील अनेक मुख्य डांबरी रस्ते उखडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक होत आहे. भामरागड व सिरोंचा शहरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बकाल झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मजबूत व दर्जेदार होण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तशी मागणीही अहेरी उपविभागातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. अहेरी उपविभागात अनेक मुख्य रस्त्यालगत मोठे झाडे असून या झाडांच्या फांद्याही वाढल्या आहेत. वादळाने झाडे रस्त्यावर कोसळून रहदारीस अडथळा निर्माण होत असते.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक