शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेती सबलीकरणाकडे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:45 IST

अनुगामीन लोकराज्य महाअभियान संस्था व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्याच्या तोडसा येथील मामा तलाव ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ या योजनेत समाविष्ट करण्यात आला. तलावातील गाळ काढून शेतात टाकण्यात आला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : तोडसा येथील मामा तलावाचे जलपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : अनुगामीन लोकराज्य महाअभियान संस्था व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्याच्या तोडसा येथील मामा तलाव ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ या योजनेत समाविष्ट करण्यात आला. तलावातील गाळ काढून शेतात टाकण्यात आला. त्यामुळे सदर तलावातील पाणीसाठा वाढला. सदर योजनेतून जलसमृद्धीसोबतच शेती सबलीकरणाकडे पाऊल पडत आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.तोडसा येथील मामा तलावाचे जलपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सचिन पानसरे, नायब तहसीलदार बुरांडे, तोडसाचे सरपंच प्रशांत आत्राम, संस्थेचे उपविभाग प्रमुख संदीप लांजेवार, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, जि. प. सभापती माधुरी उरेते, शाखा अभियंता मुके, अनुलोमचे जनसेवक पंकज नैनुरवार, वस्तीमित्र राहूल पालकृतीवार, नवीन बाला, जनार्धन नळलावार, सचिन मोतकुरवार, मुकेश नामेवार, रवी नेलकुद्री आदी उपस्थित होते.याप्रसंगी पालकमंत्री आत्राम यांनी तलावातून निर्माण झालेल्या सिंचन सुविधेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दुबार पीक घ्यावे, असे आवाहन केले. गाळयुक्त शिवार योजनेतून तोडसाच्या मामा तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे या तलावात जलसाठा वाढला असून हातपंप व विहिरीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी सुविधा निर्माण झाली आहे, असे पालकमंत्री आत्राम म्हणाले. सरपंच प्रशांत आत्राम व शेतकरी कुंदन दुर्गे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती