शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

शेती सबलीकरणाकडे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:45 IST

अनुगामीन लोकराज्य महाअभियान संस्था व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्याच्या तोडसा येथील मामा तलाव ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ या योजनेत समाविष्ट करण्यात आला. तलावातील गाळ काढून शेतात टाकण्यात आला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : तोडसा येथील मामा तलावाचे जलपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : अनुगामीन लोकराज्य महाअभियान संस्था व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्याच्या तोडसा येथील मामा तलाव ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ या योजनेत समाविष्ट करण्यात आला. तलावातील गाळ काढून शेतात टाकण्यात आला. त्यामुळे सदर तलावातील पाणीसाठा वाढला. सदर योजनेतून जलसमृद्धीसोबतच शेती सबलीकरणाकडे पाऊल पडत आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.तोडसा येथील मामा तलावाचे जलपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सचिन पानसरे, नायब तहसीलदार बुरांडे, तोडसाचे सरपंच प्रशांत आत्राम, संस्थेचे उपविभाग प्रमुख संदीप लांजेवार, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, जि. प. सभापती माधुरी उरेते, शाखा अभियंता मुके, अनुलोमचे जनसेवक पंकज नैनुरवार, वस्तीमित्र राहूल पालकृतीवार, नवीन बाला, जनार्धन नळलावार, सचिन मोतकुरवार, मुकेश नामेवार, रवी नेलकुद्री आदी उपस्थित होते.याप्रसंगी पालकमंत्री आत्राम यांनी तलावातून निर्माण झालेल्या सिंचन सुविधेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दुबार पीक घ्यावे, असे आवाहन केले. गाळयुक्त शिवार योजनेतून तोडसाच्या मामा तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे या तलावात जलसाठा वाढला असून हातपंप व विहिरीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी सुविधा निर्माण झाली आहे, असे पालकमंत्री आत्राम म्हणाले. सरपंच प्रशांत आत्राम व शेतकरी कुंदन दुर्गे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती