शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

शेतकऱ्यांचे उभे पीक जात आहे पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 6:00 AM

तेलंगाणा सरकारने मेडिगड बॅरेज बांधकाम करण्याच्या आधीच तेलंगणा राज्याच्या हद्दीत लहान-लहान जलसिंचन प्रकल्प उभारले. आता त्यांच्या हद्दीतील बॅरेजमधील बॅक वाटरला मोठे पंप लावून पाईपलाईनद्वारे छोटे-मोठे तलाव, धरणे भरून घेत आहेत. इकडे मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्या ५० वर्षापासून जलसिंचन प्रकल्प रेंगाळत आहेत. यामुळे मेडीगड्डाचे पाणी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना शाप ठरत आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणेची डोळ्यावर पट्टी : मेडिगड्डाच्या पाण्याखाली बुडणाºया पिकांमुळे शेतकरी हवालदिल

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारच्या बहुचर्चित मेडिगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा राज्य सुजलाम-सुफलाम होत असले तरी या बॅरेजच्या बॅक वॉटरमुळे महाराष्ट्राच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जात आहे. हजारो हेक्टरमधील उभे पीक पाण्याखाली जात असताना तालुका किंवा जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी, तोंडावर बोट ठेवून असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.अवघ्या तीन वर्षात तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडिगड्डा या भव्य प्रकल्पामुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेतीला सिंचन होण्यासोबतच या प्रकल्पाचे पाणी त्या राज्यातील कोट्यवधी लोकांची तहान भागवणार आहे. परंतू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प मरणदायी ठरण्याची शक्यता आता बळावली आहे. यावर्षी पहिल्यांदाच या प्रकल्पाचे पाणी अडविल्यानंतर प्रकल्पाचे पाणी बुडित क्षेत्रालगतच्या शेतांमधील पिकांमध्ये पसरत आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेले उभे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असताना प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.सिरोंचा तालुक्यातील वडधम (पोचमपल्ली) गावाजवळील मेडिगड्डा प्रकल्पाच्या बॅरेजचे दरवाजे बंद केल्याने प्राणहिता नदीतील वर्षभर वाहणारे प्रकल्पाचे पाणी वेगाने मागे जाऊन महाराष्ट्राच्या बाजूने गोदावरी व प्राणहिता नदीच्या खोऱ्यातील मूग, ज्वारी, चना, भूईमूग यासारख्या रबी पिकांना फटका बसत आहे.तेलंगाणा सरकारने मेडिगड बॅरेज बांधकाम करण्याच्या आधीच तेलंगणा राज्याच्या हद्दीत लहान-लहान जलसिंचन प्रकल्प उभारले. आता त्यांच्या हद्दीतील बॅरेजमधील बॅक वाटरला मोठे पंप लावून पाईपलाईनद्वारे छोटे-मोठे तलाव, धरणे भरून घेत आहेत. इकडे मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्या ५० वर्षापासून जलसिंचन प्रकल्प रेंगाळत आहेत. यामुळे मेडीगड्डाचे पाणी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना शाप ठरत आहे.पाण्याखाली गेलेल्या शेतीचे सर्वेक्षण करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.नुकसानभरपाई कोण देणार?हाताशी आलेले पीक आता वाया जाणार या चिंतेने ग्रस्त शेतकºयांना आता या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा प्रश्न पडला आहे. पीकांची नुकसानभरपाई महाराष्ट्र सरकार देणार, की तेलंगणा सरकार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने आापल्या शेतकºयांच्या फायद्या-तोट्याचा विचार न करता तेलंगणा सरकारला पूर्ण मदत केली. त्यामुळे आता राज्य सरकारनेच शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.अधिकारी बेजबाबदारमेडिगड्डाच्या बॅक वॉटरमुळे पोचमपल्ली, पेंटीपाका, आरडा, सिरोंचा, मेडाराम, कारासपल्ली, रंगाय्यपली, कोठा, पोचमपल्ली आदी गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. यात तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना आतापर्यंत तालुका प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने तिकडे फिरकूनही पाहिले नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती