शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

शेतकऱ्यांचे उभे पीक जात आहे पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

तेलंगाणा सरकारने मेडिगड बॅरेज बांधकाम करण्याच्या आधीच तेलंगणा राज्याच्या हद्दीत लहान-लहान जलसिंचन प्रकल्प उभारले. आता त्यांच्या हद्दीतील बॅरेजमधील बॅक वाटरला मोठे पंप लावून पाईपलाईनद्वारे छोटे-मोठे तलाव, धरणे भरून घेत आहेत. इकडे मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्या ५० वर्षापासून जलसिंचन प्रकल्प रेंगाळत आहेत. यामुळे मेडीगड्डाचे पाणी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना शाप ठरत आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणेची डोळ्यावर पट्टी : मेडिगड्डाच्या पाण्याखाली बुडणाºया पिकांमुळे शेतकरी हवालदिल

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारच्या बहुचर्चित मेडिगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा राज्य सुजलाम-सुफलाम होत असले तरी या बॅरेजच्या बॅक वॉटरमुळे महाराष्ट्राच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला जात आहे. हजारो हेक्टरमधील उभे पीक पाण्याखाली जात असताना तालुका किंवा जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी, तोंडावर बोट ठेवून असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.अवघ्या तीन वर्षात तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडिगड्डा या भव्य प्रकल्पामुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेतीला सिंचन होण्यासोबतच या प्रकल्पाचे पाणी त्या राज्यातील कोट्यवधी लोकांची तहान भागवणार आहे. परंतू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प मरणदायी ठरण्याची शक्यता आता बळावली आहे. यावर्षी पहिल्यांदाच या प्रकल्पाचे पाणी अडविल्यानंतर प्रकल्पाचे पाणी बुडित क्षेत्रालगतच्या शेतांमधील पिकांमध्ये पसरत आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेले उभे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असताना प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.सिरोंचा तालुक्यातील वडधम (पोचमपल्ली) गावाजवळील मेडिगड्डा प्रकल्पाच्या बॅरेजचे दरवाजे बंद केल्याने प्राणहिता नदीतील वर्षभर वाहणारे प्रकल्पाचे पाणी वेगाने मागे जाऊन महाराष्ट्राच्या बाजूने गोदावरी व प्राणहिता नदीच्या खोऱ्यातील मूग, ज्वारी, चना, भूईमूग यासारख्या रबी पिकांना फटका बसत आहे.तेलंगाणा सरकारने मेडिगड बॅरेज बांधकाम करण्याच्या आधीच तेलंगणा राज्याच्या हद्दीत लहान-लहान जलसिंचन प्रकल्प उभारले. आता त्यांच्या हद्दीतील बॅरेजमधील बॅक वाटरला मोठे पंप लावून पाईपलाईनद्वारे छोटे-मोठे तलाव, धरणे भरून घेत आहेत. इकडे मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्या ५० वर्षापासून जलसिंचन प्रकल्प रेंगाळत आहेत. यामुळे मेडीगड्डाचे पाणी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना शाप ठरत आहे.पाण्याखाली गेलेल्या शेतीचे सर्वेक्षण करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.नुकसानभरपाई कोण देणार?हाताशी आलेले पीक आता वाया जाणार या चिंतेने ग्रस्त शेतकºयांना आता या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा प्रश्न पडला आहे. पीकांची नुकसानभरपाई महाराष्ट्र सरकार देणार, की तेलंगणा सरकार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने आापल्या शेतकºयांच्या फायद्या-तोट्याचा विचार न करता तेलंगणा सरकारला पूर्ण मदत केली. त्यामुळे आता राज्य सरकारनेच शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.अधिकारी बेजबाबदारमेडिगड्डाच्या बॅक वॉटरमुळे पोचमपल्ली, पेंटीपाका, आरडा, सिरोंचा, मेडाराम, कारासपल्ली, रंगाय्यपली, कोठा, पोचमपल्ली आदी गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. यात तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना आतापर्यंत तालुका प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने तिकडे फिरकूनही पाहिले नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती