शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:30 IST

मानव विकास मिशन योजनेतून एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा करण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेवर बस पोहोचत नसल्याने तसेच शाळेजवळ थांबा देण्यात आला नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यास अडचण येत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी त्रस्त : शालेय बस वेळेवर सोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : मानव विकास मिशन योजनेतून एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा करण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेवर बस पोहोचत नसल्याने तसेच शाळेजवळ थांबा देण्यात आला नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यास अडचण येत आहे.मानव विकास मिशनच्या बसगाड्या शाळेच्या वेळेत सोडण्यात याव्या. तसेच शाळेजवळ बसथांबा देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना वेळेवर शाळेत जाता यावे, यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास मिशन अंतर्गत बसगाड्यांची सुविधा करण्यात आली आहे. या बसगाड्यांच्या वाहतुकीचा खर्च सरकार देत आहे. सदर बसगाड्यांमध्ये केवळ विद्यार्थ्यांनीच प्रवास करावा, असे असताना एसटी महामंडळाने मनमानी कारभार सुरू केला आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसगाड्यातून प्रवाशी खचाखच भरून नेले जातात. याचा विद्यार्थ्यांना बऱ्याचदा फटका बसतो.काही बसथांब्यावर विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत असताना बसगाडी थांबविली जात नाही. परिणामी विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाही. एकूणच महामंडळाकडून नियमाला बगल दिली जात आहे. धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये प्रवेश असलेले १६० विद्यार्थी बाहेर गावावरून ये-जा करीत असतात.सदर शाळेची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ अशी आहे. मात्र धानोरा तालुक्यात अनेक मार्गावर या वेळेत बस फेरी नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचत नाही. सायंकाळी शाळा सुटण्याअगोदर बसेस निघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना धानोराच्या बसस्थानकावर सायंकाळी ७ वाजेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी त्यांना घरी पोहोचण्यास उशीर होतो. अशा वेळी बाहेरगावावरून ये-जा करणाºया मुलींना छेडछाड व इतर प्रकारचा धोका होण्याची शक्यता आहे.बसथांबा व बसफेरी शाळेच्या वेळेत सोडण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याध्यापकांच्या वतीने ६ जुलै रोजी गडचिरोलीच्या आगार व्यवस्थापकांना देण्यात आले होते. त्यावेळी व्यवस्थापकाने सकारात्मक प्रतिसादही दर्शविला होता. मात्र विद्यार्थी व पालकांच्या मागणी पूर्ण करण्यात आली नाही.असे हवे वेळापत्रकधानोरावरून गडचिरोलीकडे जाणारी सायंकाळी ४.४५ वाजताची बस ५.१५ वाजता सोडण्यात यावी, धानोरा-मुरूमगाव-कोटगूल ही बसफेरी ४.३० वाजता ऐवजी सायंकाळी ५.१५ वाजता धानोरा येथून सोडण्यात यावी, अशा पध्दतीचे वेळापत्रक महामंडळाच्या गडचिरोली आगाराने केल्यास विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर होईल. मुरूमगाववरून येणारी बस धानोरा येथे शाळेजवळ थांबविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांची आहे.

टॅग्स :Schoolशाळाstate transportएसटी