शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

पेरणी घटली अन् भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:01 IST

२० वर्षांपूर्वी रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेत हाेते. मात्र काही कालावधीनंतर जवस व करडई या दाेन्ही पिकांचे उत्पादन घेणे बंद झाले. त्यानंतर शेतकरी खरीप हंगामात साेयाबीनच्या लागवडीकडे वळला हाेता. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपर्यंत साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र काही दिवसानंतर भाव पडायला सुरूवात झाली. त्या तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन ऐवजी कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाेषक वातावरण : तेलवर्गीय पिकांकडे वळण्याची गरज

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : तेलवर्गीय पिकांचे काही वर्षांआधी जिल्ह्यात बऱ्यापैकी उत्पादन घेतले जात हाेते. मात्र भाव पडल्याने शेतकऱ्यांना ताेटा हाेण्यास सुरुवात झाली. परिणामी या पिकांचे क्षेत्र घटले. पण आता तेलाची मागणी वाढली असल्याने तेलवर्गीय पिकांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांकडे पुन्हा वळण्यास त्यांच्या उत्पन्नात चांगली भर पडू शकते.२० वर्षांपूर्वी रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेत हाेते. मात्र काही कालावधीनंतर जवस व करडई या दाेन्ही पिकांचे उत्पादन घेणे बंद झाले. त्यानंतर शेतकरी खरीप हंगामात साेयाबीनच्या लागवडीकडे वळला हाेता. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपर्यंत साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र काही दिवसानंतर भाव पडायला सुरूवात झाली. त्या तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन ऐवजी कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली. आता तर केवळ ५०० हेक्टरवर साेयाबीनची लागवड केली जात आहे. रबी हंगामात इतर सर्व पिकांना तिलांजली देत येथील शेतकरी आता मका पिकाकडे वळला असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात दरवर्षी मक्याचे क्षेत्र वाढत चालले आहे. एवढेच नाही तर आजपर्यंत ज्या शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात हाेते. त्या शेतीत आता मक्याची लागवड केली जात आहे. इतर कडधान्याच्या जमिनीतसुद्धा मका लावला जात आहे. मुरूमगाव, सावरगाव, मालेवाडा यासारख्या दुर्गम भागांमध्ये सुद्धा मक्याची लागवड केली जात आहे. 

शेतकऱ्यांना संधीगडचिराेली जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण तेलबियांच्या पिकांसाठी पाेषक आहे. रबी हंगामात प्रामुख्याने जवस, करडई, भुईमूग, साेयाबीन, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जात हाेते. कालांतराने या पिकांची जागा दुसऱ्या पिकांनी घेतली. आता मात्र तेलवर्गीय पिकांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे या पिकांची पेरणी करून अधिकचे उत्पादन घेण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. 

कमी सिंचनात उत्पादनतेलवर्गीय पिकांचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे अत्यंत कमी सिंचनात या पिकाचे उत्पादन हाेते. जवस, करडई, भूईमूग या पिकांना तर सिंचनाची अजिबात आवश्यकता राहत नाही. या पिकांवर इतर किडींचाही प्रादुर्भाव हाेत नाही. कीटकनाशके व सिंचनाचा खर्च कमी झाल्याने उत्पादन खर्चात घट हाेते. धान पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेणे शक्य आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.  

टॅग्स :agricultureशेती