शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पेरणी घटली अन् भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:01 IST

२० वर्षांपूर्वी रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेत हाेते. मात्र काही कालावधीनंतर जवस व करडई या दाेन्ही पिकांचे उत्पादन घेणे बंद झाले. त्यानंतर शेतकरी खरीप हंगामात साेयाबीनच्या लागवडीकडे वळला हाेता. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपर्यंत साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र काही दिवसानंतर भाव पडायला सुरूवात झाली. त्या तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन ऐवजी कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाेषक वातावरण : तेलवर्गीय पिकांकडे वळण्याची गरज

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : तेलवर्गीय पिकांचे काही वर्षांआधी जिल्ह्यात बऱ्यापैकी उत्पादन घेतले जात हाेते. मात्र भाव पडल्याने शेतकऱ्यांना ताेटा हाेण्यास सुरुवात झाली. परिणामी या पिकांचे क्षेत्र घटले. पण आता तेलाची मागणी वाढली असल्याने तेलवर्गीय पिकांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांकडे पुन्हा वळण्यास त्यांच्या उत्पन्नात चांगली भर पडू शकते.२० वर्षांपूर्वी रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेत हाेते. मात्र काही कालावधीनंतर जवस व करडई या दाेन्ही पिकांचे उत्पादन घेणे बंद झाले. त्यानंतर शेतकरी खरीप हंगामात साेयाबीनच्या लागवडीकडे वळला हाेता. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपर्यंत साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र काही दिवसानंतर भाव पडायला सुरूवात झाली. त्या तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन ऐवजी कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली. आता तर केवळ ५०० हेक्टरवर साेयाबीनची लागवड केली जात आहे. रबी हंगामात इतर सर्व पिकांना तिलांजली देत येथील शेतकरी आता मका पिकाकडे वळला असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात दरवर्षी मक्याचे क्षेत्र वाढत चालले आहे. एवढेच नाही तर आजपर्यंत ज्या शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात हाेते. त्या शेतीत आता मक्याची लागवड केली जात आहे. इतर कडधान्याच्या जमिनीतसुद्धा मका लावला जात आहे. मुरूमगाव, सावरगाव, मालेवाडा यासारख्या दुर्गम भागांमध्ये सुद्धा मक्याची लागवड केली जात आहे. 

शेतकऱ्यांना संधीगडचिराेली जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण तेलबियांच्या पिकांसाठी पाेषक आहे. रबी हंगामात प्रामुख्याने जवस, करडई, भुईमूग, साेयाबीन, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जात हाेते. कालांतराने या पिकांची जागा दुसऱ्या पिकांनी घेतली. आता मात्र तेलवर्गीय पिकांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे या पिकांची पेरणी करून अधिकचे उत्पादन घेण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. 

कमी सिंचनात उत्पादनतेलवर्गीय पिकांचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे अत्यंत कमी सिंचनात या पिकाचे उत्पादन हाेते. जवस, करडई, भूईमूग या पिकांना तर सिंचनाची अजिबात आवश्यकता राहत नाही. या पिकांवर इतर किडींचाही प्रादुर्भाव हाेत नाही. कीटकनाशके व सिंचनाचा खर्च कमी झाल्याने उत्पादन खर्चात घट हाेते. धान पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेणे शक्य आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.  

टॅग्स :agricultureशेती