शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वेळेवर उपचार न मिळाल्याने गेला बाळंतीणीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:10 IST

तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मांडरा येथील १५ दिवसांपूर्वी बाळंतीण झालेल्या एका महिलेचा वेळेवर योग्य उपचार मिळू न शकल्याने सोमवारी रात्री मृत्यू झाला. सुशीला राकेश सिडाम असे या महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देमांडरा येथील महिला : रुग्णवाहिका सेवेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक बळी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मांडरा येथील १५ दिवसांपूर्वी बाळंतीण झालेल्या एका महिलेचा वेळेवर योग्य उपचार मिळू न शकल्याने सोमवारी रात्री मृत्यू झाला. सुशीला राकेश सिडाम असे या महिलेचे नाव आहे.सुशीला ही अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर येथील मूळ रहिवासी होती. तिचा विवाह याच तालुक्यातील मांडरा येथील राकेश सिडामसोबत झाला होता. बाळंतपणासाठी ती आपल्या मूळ गावी व्यंकटापूर येथे आली होती. २१ एप्रिल रोजी तिचे घरीच बाळंतपण झाले. नंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिला २५ एप्रिल रोजी सुटी देण्यात आली.दरम्यान सुशिला सासरी पोहोचल्यानंतर तिच्या शरीरातील रक्ताच्या प्रमाणात कमतरता येऊ लागली. तिचे हिमोग्लोबिन ४ ग्रॅमवर आले. तब्येत खालावत असल्याची माहिती सुशीलाच्या सासरच्या मंडळीने गावातील आशा वर्करकडे दिली, मात्र तिच्याकडे पुरेशे साहित्य नसल्याचे तिने सांगितले. सुशीलाचा पती यावेळी छत्तीसगड राज्यात मजुरीसाठी गेला होता. तब्येत अत्यंत खालावत असल्याची माहिती सुशीलाचे भाऊजी लबंना तलांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी मांडरा गाव गाठले.सुशीलाला अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात नेण्यासाठी रु ग्णवाहिकेची गरज होती. पण अनेक प्रयत्न करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर एका खाजगी वाहनातून सोमवार दि.१४ मे रोजी सुशीलाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिला रक्त चढविण्यात आले. अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ.अमोल पेशट्टीवार तथा नर्सेस यांनी सुशीलाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण प्रकृती जास्तच खालवल्याने तिला गडचिरोली जिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आले. मात्र वाटेतच सुशीलाचा मृत्यू झाला.वेळेवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुशीलाची तपासणी केली असती तर तिचा जीव वाचला असता. दोन दिवसांपूर्वीच रुग्णवाहिका न मिळाल्याने कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका बाळांतीण महिलेचा मृत्यू झाला.कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, पुजाऱ्याकडे उपचारयादरम्यान सुशीला व तिच्या नवजात मुलीची आरोग्य कर्मचाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेणे आवश्यक होते. मात्र मांडरा येथील आरोग्य सेविका मागील दिड वर्षांपासून सतत गैरहजर आहे. तसेच एनआरएचएमअंतर्गत येत असलेली एएनएम संपावर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कोणत्याच कर्मचाराऱ्याने किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुशीला व तिच्या नवजात मुलीची तपासणी केली नाही. त्यामुळे गावातील पुजाऱ्याकडे तिचे उपचार करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :Deathमृत्यू