शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

वेळेवर उपचार न मिळाल्याने गेला बाळंतीणीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:10 IST

तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मांडरा येथील १५ दिवसांपूर्वी बाळंतीण झालेल्या एका महिलेचा वेळेवर योग्य उपचार मिळू न शकल्याने सोमवारी रात्री मृत्यू झाला. सुशीला राकेश सिडाम असे या महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देमांडरा येथील महिला : रुग्णवाहिका सेवेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक बळी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मांडरा येथील १५ दिवसांपूर्वी बाळंतीण झालेल्या एका महिलेचा वेळेवर योग्य उपचार मिळू न शकल्याने सोमवारी रात्री मृत्यू झाला. सुशीला राकेश सिडाम असे या महिलेचे नाव आहे.सुशीला ही अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर येथील मूळ रहिवासी होती. तिचा विवाह याच तालुक्यातील मांडरा येथील राकेश सिडामसोबत झाला होता. बाळंतपणासाठी ती आपल्या मूळ गावी व्यंकटापूर येथे आली होती. २१ एप्रिल रोजी तिचे घरीच बाळंतपण झाले. नंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिला २५ एप्रिल रोजी सुटी देण्यात आली.दरम्यान सुशिला सासरी पोहोचल्यानंतर तिच्या शरीरातील रक्ताच्या प्रमाणात कमतरता येऊ लागली. तिचे हिमोग्लोबिन ४ ग्रॅमवर आले. तब्येत खालावत असल्याची माहिती सुशीलाच्या सासरच्या मंडळीने गावातील आशा वर्करकडे दिली, मात्र तिच्याकडे पुरेशे साहित्य नसल्याचे तिने सांगितले. सुशीलाचा पती यावेळी छत्तीसगड राज्यात मजुरीसाठी गेला होता. तब्येत अत्यंत खालावत असल्याची माहिती सुशीलाचे भाऊजी लबंना तलांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी मांडरा गाव गाठले.सुशीलाला अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात नेण्यासाठी रु ग्णवाहिकेची गरज होती. पण अनेक प्रयत्न करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर एका खाजगी वाहनातून सोमवार दि.१४ मे रोजी सुशीलाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिला रक्त चढविण्यात आले. अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ.अमोल पेशट्टीवार तथा नर्सेस यांनी सुशीलाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण प्रकृती जास्तच खालवल्याने तिला गडचिरोली जिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आले. मात्र वाटेतच सुशीलाचा मृत्यू झाला.वेळेवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुशीलाची तपासणी केली असती तर तिचा जीव वाचला असता. दोन दिवसांपूर्वीच रुग्णवाहिका न मिळाल्याने कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका बाळांतीण महिलेचा मृत्यू झाला.कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, पुजाऱ्याकडे उपचारयादरम्यान सुशीला व तिच्या नवजात मुलीची आरोग्य कर्मचाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेणे आवश्यक होते. मात्र मांडरा येथील आरोग्य सेविका मागील दिड वर्षांपासून सतत गैरहजर आहे. तसेच एनआरएचएमअंतर्गत येत असलेली एएनएम संपावर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कोणत्याच कर्मचाराऱ्याने किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुशीला व तिच्या नवजात मुलीची तपासणी केली नाही. त्यामुळे गावातील पुजाऱ्याकडे तिचे उपचार करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :Deathमृत्यू