शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

दुर्गम भागात सौरऊर्जेचा प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:07 AM

जिल्ह्यातील ४९ गावांमध्ये वीज पुरविणे शक्य नसल्याबाबत महावितरणने शिक्कामोर्तब केल्यानंतर या गावांमध्ये मेडाअंतर्गत सौरऊर्जेवर चालणारे साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्दे‘मेडा’अंतर्गत उपक्रम : १७ गावांमध्ये काम पूर्ण; ३२ गावे ‘सौभाग्य’ योजनेतून प्रकाशणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ४९ गावांमध्ये वीज पुरविणे शक्य नसल्याबाबत महावितरणने शिक्कामोर्तब केल्यानंतर या गावांमध्ये मेडाअंतर्गत सौरऊर्जेवर चालणारे साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला. १७ गावांमध्ये सौरऊर्जेचे साहित्य पुरविण्यात आले असून उर्वरित ३२ गावांमध्ये आकांक्षित जिल्हा अंतर्गत सौरऊर्जेचे साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.एटापल्ली, भामरागड व अहेरी तालुक्यातील काही गावे घनदाट जंगल, डोंगरदऱ्या व नद्यांनी वेढली आहेत. यातील ४९ गावांना वीज पुरवठा करणे शक्य नसल्याचे महावितरणने केलेल्या पाहणीदरम्यान दिसून आले. घर तिथे वीज पुरवठा देण्याचे शासनाचे धोरण आहे. या गावांना वीज पुरवठा करणे शक्य नसल्याने सौरऊर्जेची साधने पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. एप्रिल ते मे या कालावधीत ४९ गावांपैकी १७ गावांतील ५५२ कुटुंबांना सौरऊर्जेचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सौरऊर्जेच्या साहित्यामध्ये २४ वॅटचे सोलर पॅनल, ७५ एएचची बॅटरी, चॉर्ज कंट्रोलर, १२ वॅटचे चार एलईडी बल्ब, मोबाईल चॉर्जर सॉकेट यांचा समावेश आहे. दुर्गम भागातील गावे आहेत. त्याचबरोबर हे संयत्र कधीही बिघडू शकते. त्यामुळे पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संयत्र पुरविणाऱ्या कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. ४९ पैकी ३२ गावे सौरऊर्जेपासून वंचित राहली होती. जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड झाली आहे. याअंतर्गत सौभाग्य योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत उर्वरित ३२ गावांमध्ये सौरऊर्जेचे संयंत्र पुरविले जाणार आहेत. एक महिन्याच्या कालावधीत ४९ गावे सौरऊर्जेने प्रकाशित होतील, अशी आशा आहे.सौरऊर्जा सयंत्र लागलेली १७ गावेसौरऊर्जा सयंत्र लागलेल्या १७ गावांमध्ये एटापल्ली तालुक्यातील कुंजेरमार्का, हिद्दूर, कोयर्इंदवारसा, रेखाबटलटोला, रेंगटोला, जिजावंडीटोला, तोडगट्टा, भामरागड तालुक्यातील खोदेवाडा, मुसेनपुई, कावंडे, मेडापल्ली, फुंडीएम, मर्धुर, विसामुंडी, अहेरी तालुक्यातील कोंझेड, कोडसेपल्लीमसा, कल्लमएम या गावांचा समावेश आहे. या १७ गावांतील ५५२ कुटुंबांना सौरऊर्जा संयंत्र पुरविण्यात आले आहेत.कंत्राटदारावर विशेष नजर ठेवण्याची गरजप्रत्येक कुटुंबाला सौरऊर्जा संयंत्राची जी किट पुरविली जाते, ती जवळपास सात हजार रूपयांची आहे. निविदा काढताना पुढील पाच वर्ष संबंधित सयंत्राच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविली राहते. या पाच वर्षांत एखादे सयंत्र बिघडल्यास ते नवीन सुद्धा लावून द्यावे लागते. मात्र कंत्राटदार सयंत्र लावून बिल उचलल्यानंतर पसार होत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. दुर्गम भागातील नागरिक याबाबत तक्रारही करीत नाही. त्यामुळे कंत्राटदाराचे फावते व एक ते दोन महिन्यानंतरच गावात अंधार पसरतो. ही बाब घडू नये, यासाठी संबंधित कंत्राटदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.