शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

तर जनगणना प्रक्रियेत सहकार्य करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनेच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, देशात जातनिहाय जनगणनेला १८७२ पासून सुरूवात झाली. ती १९३१ पर्यंत दर दहा वर्षांनी नियमित सुरू होती. त्यानंतर मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही. या देशात पशू व जनावरांची जनगणना होते. मात्र ओबीसींची होत नाही.

ठळक मुद्देविविध ओबीसी संघटनांची जिल्हा कचेरीवर धडक : राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकारच्या वतीने २०२१ च्या जनगणनेला सुरूवात होणार आहे. परंतु जनगणनेच्या प्रपत्रात ओबीसी प्रवर्गाचा समावेश नसल्याने ओबीसींच्या लोकसंख्येचा आकडा निदर्शनास येणार नाही. सदर जनजगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा, अन्यथा जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव जनगणनेत सहकार्य करणार नाही, असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे.या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनेच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, देशात जातनिहाय जनगणनेला १८७२ पासून सुरूवात झाली. ती १९३१ पर्यंत दर दहा वर्षांनी नियमित सुरू होती. त्यानंतर मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही. या देशात पशू व जनावरांची जनगणना होते. मात्र ओबीसींची होत नाही. ओबीसींची जनगणना होत नसल्यामुळे विकासासाठी कोणतीही आर्थिक तरतुद करण्यात येत नाही. परिणामी ओबीसी समाजाची प्रगती दिवसेंदिवस खुंटत आहे. त्यामुळे आता २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींना स्थान द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.निवेदन देताना ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, दादाजी चुधरी, गोपीनाथ चांदेवार, प्रा. देवानंद कामडी, भाष्कर नरूले, महादेव वाघे, प्रा. विनायक बांदूरकर, एस. टी. विधाते यांच्यासह ओबीसीबांधव उपस्थित होते.२१ जानेवारीला जिल्हाभर आंदोलनकेंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या जनगणनेत एससी व एसटी प्रमाणे ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा, यासह ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघटनांच्या वतीने २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हा व अकराही तालुका स्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक ओबीसी कुटुंब आपल्या घराच्या दारावर ‘जनगणना २०२१ मध्ये ओबीसी कॉलम नाही, म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही’ अशा आशयाच्या पाट्या लावण्यासाठी संघटनेच्या वतीने चळवळ उभारण्यात येणार आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक