शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तर जनगणना प्रक्रियेत सहकार्य करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनेच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, देशात जातनिहाय जनगणनेला १८७२ पासून सुरूवात झाली. ती १९३१ पर्यंत दर दहा वर्षांनी नियमित सुरू होती. त्यानंतर मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही. या देशात पशू व जनावरांची जनगणना होते. मात्र ओबीसींची होत नाही.

ठळक मुद्देविविध ओबीसी संघटनांची जिल्हा कचेरीवर धडक : राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकारच्या वतीने २०२१ च्या जनगणनेला सुरूवात होणार आहे. परंतु जनगणनेच्या प्रपत्रात ओबीसी प्रवर्गाचा समावेश नसल्याने ओबीसींच्या लोकसंख्येचा आकडा निदर्शनास येणार नाही. सदर जनजगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा, अन्यथा जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव जनगणनेत सहकार्य करणार नाही, असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे.या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनेच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, देशात जातनिहाय जनगणनेला १८७२ पासून सुरूवात झाली. ती १९३१ पर्यंत दर दहा वर्षांनी नियमित सुरू होती. त्यानंतर मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही. या देशात पशू व जनावरांची जनगणना होते. मात्र ओबीसींची होत नाही. ओबीसींची जनगणना होत नसल्यामुळे विकासासाठी कोणतीही आर्थिक तरतुद करण्यात येत नाही. परिणामी ओबीसी समाजाची प्रगती दिवसेंदिवस खुंटत आहे. त्यामुळे आता २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींना स्थान द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.निवेदन देताना ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, दादाजी चुधरी, गोपीनाथ चांदेवार, प्रा. देवानंद कामडी, भाष्कर नरूले, महादेव वाघे, प्रा. विनायक बांदूरकर, एस. टी. विधाते यांच्यासह ओबीसीबांधव उपस्थित होते.२१ जानेवारीला जिल्हाभर आंदोलनकेंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या जनगणनेत एससी व एसटी प्रमाणे ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा, यासह ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघटनांच्या वतीने २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हा व अकराही तालुका स्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक ओबीसी कुटुंब आपल्या घराच्या दारावर ‘जनगणना २०२१ मध्ये ओबीसी कॉलम नाही, म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही’ अशा आशयाच्या पाट्या लावण्यासाठी संघटनेच्या वतीने चळवळ उभारण्यात येणार आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक