शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

सहा महिन्यांत आष्टी परिसरात उद्योगासाठी जागा शोधणार

By admin | Updated: September 18, 2016 01:54 IST

बहुप्रतिक्षीत सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्पाचा मार्ग प्रशासनाच्या सहकार्यामुळे सुकर होण्याची चिन्ह दिसू लागली आहे.

अटींची पूर्तता झाल्यास जागा देण्यास तयार : सुरजागडवरून लोहखनिजाची वाहतूक पावसामुळे रखडलीगडचिरोली : बहुप्रतिक्षीत सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्पाचा मार्ग प्रशासनाच्या सहकार्यामुळे सुकर होण्याची चिन्ह दिसू लागली आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर चार महिन्यानंतर मालाची वाहतूक करण्यासाठी रस्ता तयार करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. येथून लोहखनिज चंद्रपूर जिल्ह्यात सहा महिने वाहून नेल्यानंतर चामोर्शी तालुक्यातील आष्टी, कोनसरी परिसरात प्रकल्प टाकण्यासाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. सहा महिन्याच्या आता स्थानिक शेतकऱ्यांची जागा घेऊन एक ते दीड वर्षात येथे प्रकल्प उभा करण्याची तयारी लायडस् मेटल या उद्योग समुहाने चालविली असल्याची माहिती आहे.लायडस् मेटल या उद्योग समुहाचे विदर्भात वर्धाजवळच्या भूगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे प्रकल्प असून १० वर्षापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात लीज घेऊन त्यांना उत्खननाचे काम करता आले नव्हते. मात्र केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तारूढ झाल्यानंतर केंद्रीय गृह विभागाने या भागात उद्योग उभारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर येथे उत्खननाच्या कामाला सुरूवात करण्याची हिंमत कंपनीने केली. मध्यंतरी मे महिन्यात आंदोलनामुळे काही काळ सुरू झालेली लोहखनिजाची वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये पुन्हा रस्ता तयार करून वाहतूक सुरू होणार तोच पावसाने रस्ता खराब झाल्याने सध्या वाहतूक ठप्प पडून आहे. सध्या केंद्र सरकारकडून येथे पॅरामिल्ट्री फोर्सेसच्या काही तुकड्या पाठविण्यात आल्या आहे. शिवाय लिजच्या अटी शर्तीनुसार येथे मालवाहतुकीसाठी रस्ताही तयार करू देण्यात आला आहे. याचाच अर्थ येथून आता लवकरच मालाची वाहतूक होण्याची शक्यता आहे. आष्टी, कोनसरी परिसरात एमआयडीसी निर्माण व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांशी विविध स्तरावर वाटाघाटी करीत होते. या भागातील शेतकऱ्यांच्या अटींना माणून या भागात जमीन उद्योगासाठी खरेदी करण्याची तयारी कंपनीने केली असून त्या दृष्टीने प्रशासनाला सुध्दा सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या भागातील काही शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन जमिनीबाबत चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. एकूणच परिस्थिती पाहू जाता गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिज प्रकल्प येत्या तीन वर्षात सुरू होण्याची आशा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)रेल्वेचे जाळे विस्तारित करण्याचा प्रयत्नगेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर व गडचिरोली-चिमूर या दोन्ही लोकसभा क्षेत्राच्या खासदारांनी बल्लारशहा-सुरजागड या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण व्हावे, यासाठी मागणी केली होती. सुरजागड परिसरात उद्योग व लोहखनिज उत्खननाचे काम सुरू झाल्यास या भागात रेल्वेचे जाळे विस्तारण्याची शक्यता असून वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाचाही एटापल्लीपर्यंत विस्तार खासगी उद्योजकांच्या माध्यमातून करून घेण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी केंद्रस्तरावरही बैठक झाली, असे समजते. खासगी रेल्वे मार्ग टाकून त्यावर प्रवाशी व कंपनीची वाहतूक देशात अनेक भागात केली जाते. असाच हा प्रयत्न राहणार आहे.