शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

आकांक्षी तालुका कार्यक्रमात सिराेंचा अव्वल, अहेरीचीही भरारी; नीती आयोगाकडून पहिल्या तिमाहीचे मूल्यांकन जाहीर

By संजय तिपाले | Updated: December 16, 2023 21:04 IST

देशाच्या पश्चिम विभागात समाविष्ट महाराष्ट्र,गुजरात गोवा,राजस्थान या चार राज्यांतून दुर्गम सिरोंचा तालुक्याने अव्वल तर अहेरीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

गडचिरोली : अविकसित व मागास जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत देशव्यापी आकांक्षी तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यांतर्गत संबंधित भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या पश्चिम विभागात समाविष्ट महाराष्ट्र,गुजरात गोवा,राजस्थान या चार राज्यांतून दुर्गम सिरोंचा तालुक्याने अव्वल तर अहेरीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.केंद्र शासनाने २०१८मध्ये आकांक्षित जिल्हा कार्यक्रम जाहीर केला. त्याच धर्तीवर आकांक्षित तालुका कार्यक्रम जानेवारी २०२३ मध्ये सुरु केला आहे. मागास जिल्ह्यांना विकसित करण्यासाठी आकांक्षी तालुका कार्यक्रम (एबीसी) या महत्त्वांकाक्षी उपक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जानेवारी २०२३ रोजी केली होती. देशभरातील ५०० तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविला जात असून गडचिरोलीतील भामरागड, अहेरी व सिरोंचा या तीन तालुक्यांचा यात समावेश आहे. देशभरातील राज्यांचे क्षेत्रनिहाय विभाग तयार केले आहेत. क्षेत्र क्र. चार मध्ये महाराष्ट्रासह गुजरात, गोवा व राजस्थानचा समावेश आहे.

नीती आयोगाने सप्टेंबर ते नोव्हेेंबर या पहिल्या तिमाहातील गुणांकन जाहीर केले आहे. यात सिरोंचा गटविकास अधिकारी कार्यालयाने चार राज्यांतून सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली असून अहेरीने द्वितीय स्थान मिळवले आहे. सिरोंचाचे गटविकास अधिकारी अनिकलकुमार पाटले व अहेरीचे गटविकास अधिकारी वरठे तसेच अधिकारी- कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या पहिल्या तिमाहीत जिल्ह्यातील सिरोंचा व अहेरी या तालुक्यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान मिळवले ही समाधानाची बाब आहे. हे स्थान यापुढेही कायम टिकविण्याचा प्रयत्न राहील. पंचायत समितीस्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची ही पावती आहे. आकांक्षित कार्यक्रमाद्वारे तळागाळातील लोकांपर्यंत विविध विकासयोजना पोहोचतील व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असा विश्वास आहे.- आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.३९ दिशानिर्देशांचे गुणांकनदरम्यान, आकांक्षी कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता बालविकास,रोजगार, कृषी, नळयोजना, पशुसंवर्धन अशा विविध ३९ दिशानिर्देशांचा समावेश आहे. यांतर्गत केलेल्या कामाची माहिती नीती आयोगाकडे ऑनलाइन नोंदवली जाते, त्यानुसार दर तीन महिन्यांनी क्षेत्रनिहाय गुणांकन केले जाते. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीNIti Ayogनिती आयोग