शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शिवसेनेचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:02 AM

प्रत्येक गावात व मागेल त्या शेतकºयाच्या शेतात वीज पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुका शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी वीज कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देवीज पुरवठा सुरळीत करा : महावितरणसमोर केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : प्रत्येक गावात व मागेल त्या शेतकºयाच्या शेतात वीज पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुका शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी वीज कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चानंतर मागण्यांचे निवेदन सादर केले.एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना अजूनही वीज पुरवठा झाला नाही. परिणामी तेथील नागरिकांना अंधारातच जीवन कंठावे लागत आहे. अनेक शेतकºयांनी शेतात वीज पुरवठा करून पंप बसविण्यासाठी वीज विभागाकडे अर्ज केले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही त्यांना वीज पुरवठा करण्यात आला नाही. अनेकांकडे विहिरी आहेत. मात्र पंप नसल्याने बेकामी ठरल्या आहेत. ग्रामीण भागातील काही नागरिकांना १० ते १५ हजार रूपयापर्यंतचे बिल पाठविले जात आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. घरात दोन बल्ब, एक पंखा असतानाही १० ते १५ हजार रूपयांचे बिल कसे पाठविले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील काही दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तीन ते चार दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नाही. बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेच्या समस्या त्यांच्या लक्षात येत नाही. सर्व कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.सदर मोर्चा उपजिल्हा प्रमुख राजगोपाल सुंचावार, कामगार सेना प्रमुख विलास परमेलवार, रेणुका बोरूले, बालू शेंडे, सुशिला रच्चावार, रमेश गंगावणवार, वसंत चापले, श्यामसुंदर कुंभारे, बंडू तलांडे, दलसू तलांडे, महेश बिरमवार, राजू उसेंडी, बंडू पुंगाटी, रितूू कुळेपेटी, श्यामदास पुंगाटी, लालू मडावी, दोहे तलांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.