शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

शंकरपट बंदीने झाडीपट्टीला लागले मंडईचे वेध

By admin | Updated: April 1, 2016 01:53 IST

सर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यानंतर गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टीतील नागरिकांना मंडईचे वेध लागले आहेत.

गर्दी वाढली : गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विशेष महत्त्वअतुल बुराडे विसोरासर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यानंतर गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टीतील नागरिकांना मंडईचे वेध लागले आहेत. शंकरपटाऐवजी आता नागरिक मंडईमध्ये गर्दी करू लागले असल्याने मंडईची क्रेझ वाढली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यामुळे या चार जिल्ह्यांना महाराष्ट्राचे तांदळाचे कोठार म्हणूनही ओळखल्या जाते. खरीप हंगामातील धान पीक नोव्हेंबर महिन्यात निघते. डिसेंबर महिन्यात कापणी व बांधणीचे काम पूर्ण होते. सतत चार महिने धानाच्या शेतीत राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याला थोडीफार उसंत मिळते. त्याचबरोबर धान विकून पैसेही जमा होतात. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्याच्या घरी आनंद व पैसा खेळायला लागतो. या दिवसांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये मंडईचे आयोजन करण्यात येते. मंडई हा एकच शब्द असला तरी मंडईच्या दिवशी त्या गावामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडईच्या दिवशी दिवसभर गावाच्या जवळपास छोटेखानी जत्रेचे आयोजन करण्यात येते. या जत्रेला गावातील नागरिकांचे नातेवाईक व सभोवतालच्या गावांमधील नागरिक उपस्थित राहतात. रात्रीच्या सुमारास त्या गावामध्ये दंडार, नाटक, तमाशा, छत्तीसगडी नृत्य आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे दिवस व रात्रभर विविध कार्यक्रमांचे रेलचेल राहते. सर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटांवर बंदी घालण्याच्या पूर्वी जत्रेबरोबरच शंकरपटाचे आयोजनही केले जात होते. मात्र शंकरपटावर बंदी घातली असल्याने आता मंडईमध्ये नागरिकांची गर्दी वाढायला लागली आहे. मंडईचे आयोजन महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांबरोबरच सीमेवरच्या छत्तीसगड राज्यांतील जिल्ह्यांमध्येही आयोजित केली जाते. एकच दिवसाची मंडई भरत असली तरी त्या गावासाठी तो सर्वाधिक आनंदाचा दिवस राहते. त्यामुळे त्या मंडईच्या दिवसाचे वेध गावकऱ्यांना दोन महिन्यांपासूनच लागलेले राहते. नियोजन करून मंडईचा आनंद कसा लुटायचा हे ठरविले जाते. फेब्रुवारी महिन्यापासून मंडई भरण्यास सुरूवात झाली आहे. सध्या मंडईची रेलचेल ग्रामीण भागामध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.मंडईतून लग्नही जोडतातमंडईच्या निमित्ताने सर्व नातेवाईकांना बोलविले जाते. त्यामुळे मंडईसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक उपवर- वधू यांच्याविषयी बोलणी करतात. ही प्राथमिक बोलणी राहते. त्यानंतर लग्न जोडल्या जाते. त्याचबरोबर मंडईसाठी तरूण मुले- मुली एकमेकांना पसंत करतात. त्यामुळे मंडईच्या माध्यमातून लग्न जुडण्यासही मदत होत असल्याने मंडईचे महत्त्व आणखीच वाढले आहे.