शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

शंकरपट बंदीने झाडीपट्टीला लागले मंडईचे वेध

By admin | Updated: April 1, 2016 01:53 IST

सर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यानंतर गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टीतील नागरिकांना मंडईचे वेध लागले आहेत.

गर्दी वाढली : गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विशेष महत्त्वअतुल बुराडे विसोरासर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यानंतर गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टीतील नागरिकांना मंडईचे वेध लागले आहेत. शंकरपटाऐवजी आता नागरिक मंडईमध्ये गर्दी करू लागले असल्याने मंडईची क्रेझ वाढली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यामुळे या चार जिल्ह्यांना महाराष्ट्राचे तांदळाचे कोठार म्हणूनही ओळखल्या जाते. खरीप हंगामातील धान पीक नोव्हेंबर महिन्यात निघते. डिसेंबर महिन्यात कापणी व बांधणीचे काम पूर्ण होते. सतत चार महिने धानाच्या शेतीत राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याला थोडीफार उसंत मिळते. त्याचबरोबर धान विकून पैसेही जमा होतात. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्याच्या घरी आनंद व पैसा खेळायला लागतो. या दिवसांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये मंडईचे आयोजन करण्यात येते. मंडई हा एकच शब्द असला तरी मंडईच्या दिवशी त्या गावामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडईच्या दिवशी दिवसभर गावाच्या जवळपास छोटेखानी जत्रेचे आयोजन करण्यात येते. या जत्रेला गावातील नागरिकांचे नातेवाईक व सभोवतालच्या गावांमधील नागरिक उपस्थित राहतात. रात्रीच्या सुमारास त्या गावामध्ये दंडार, नाटक, तमाशा, छत्तीसगडी नृत्य आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे दिवस व रात्रभर विविध कार्यक्रमांचे रेलचेल राहते. सर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटांवर बंदी घालण्याच्या पूर्वी जत्रेबरोबरच शंकरपटाचे आयोजनही केले जात होते. मात्र शंकरपटावर बंदी घातली असल्याने आता मंडईमध्ये नागरिकांची गर्दी वाढायला लागली आहे. मंडईचे आयोजन महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांबरोबरच सीमेवरच्या छत्तीसगड राज्यांतील जिल्ह्यांमध्येही आयोजित केली जाते. एकच दिवसाची मंडई भरत असली तरी त्या गावासाठी तो सर्वाधिक आनंदाचा दिवस राहते. त्यामुळे त्या मंडईच्या दिवसाचे वेध गावकऱ्यांना दोन महिन्यांपासूनच लागलेले राहते. नियोजन करून मंडईचा आनंद कसा लुटायचा हे ठरविले जाते. फेब्रुवारी महिन्यापासून मंडई भरण्यास सुरूवात झाली आहे. सध्या मंडईची रेलचेल ग्रामीण भागामध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.मंडईतून लग्नही जोडतातमंडईच्या निमित्ताने सर्व नातेवाईकांना बोलविले जाते. त्यामुळे मंडईसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक उपवर- वधू यांच्याविषयी बोलणी करतात. ही प्राथमिक बोलणी राहते. त्यानंतर लग्न जोडल्या जाते. त्याचबरोबर मंडईसाठी तरूण मुले- मुली एकमेकांना पसंत करतात. त्यामुळे मंडईच्या माध्यमातून लग्न जुडण्यासही मदत होत असल्याने मंडईचे महत्त्व आणखीच वाढले आहे.