शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

सातबाराची साईट अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:03 AM

मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे.

ठळक मुद्दे १० दिवस होती बंद : सोमवारपासून सातबारा मिळण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे.पीक कर्ज घेणे, खत खरेदी तसेच इतर कामांसाठी सातबाराची गरज भासते. खरीपाचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे विविध कामांसाठी शेतकऱ्यांकडून सातबाराची मागणी वाढली आहे. अशातच मागील १० दिवस आॅनलाईन सातबाराची साईट बंद होती. त्यामुळे शेतकºयांना सातबारा उपलब्ध होत नव्हता. सातबारासाठी तलाठ्याकडे आलेल्या शेतकऱ्याला निराश होऊन परत जावे लागत होते. सातबारा न मिळाल्याने काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज मिळण्यासही अडचण निर्माण झाली होती. मात्र आॅनलाईन सातबाराशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी व तलाठी सुध्दा हैराण झाले होते. सोमवारपासून मात्र सातबाराची साईट सुरू झाली आहे. तलाठ्याचे लॉगीन आयडी टाकल्यानंतर सातबारा उपलब्ध होत आहे. सातबारा मिळवण्यासाठी तलाठ्यांकडे शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. सातबारा देण्याबरोबरच फेरफार, नमुना ८ अ देण्याचे काम सुध्दा सुरू झाले आहे.आपले सरकार येथून सुध्दा सातबारा उपलब्ध होतो. मात्र सदर साईट अजुनही बंद असल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या किंवा महाआॅनलाईनच्या सेतू केंद्रातून सातबारा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडेच जावे लागत आहे. तलाठ्यांकडून सातबारा उपलब्ध होण्यास सुरूवात झाल्याने शेतकºयांची गैरसोय थांबली आहे. खरीप हंगामापूर्वी विविध कामांसाठी शेतकऱ्यांकडून सर्वाधिक सातबाराची मागणी होते. साईटमध्ये काही बदल करायचा असल्यास तो खरीपाच्या हंगामानंतर करावा. यानंतर खरीप हंंगाम संपेपर्यंत साईट बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सेतू केंद्रातील समस्या कायमभूअभिलेख, आपले सरकार या पोर्टलद्वारे आपले सरकार सेवा केंद्र, महाआॅनलाईनच्या सेवा केंद्रावरूनही सातबारा काढता येतो. मात्र सदर पोर्टल अजुनही सुरू झाले नाही. त्यामुळे या पोर्टलवरून सातबारा मिळण्यास अडचण जात आहे. शेतकरी जवळपासच्या केंद्रात जाऊन सातबारा विषयी विचारणा करीत आहेत. मात्र साईट बंद असल्याचे केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे. १५ जूनपर्यंत पीक कर्ज देण्याची मुदत असल्याने शेतकरी वर्ग सातबारासाठी गर्दी करीत आहेत. मात्र त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.