शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

न्यायासाठी माध्यमिक शिक्षकांना झिजवावे लागणार नागपूरचे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा हे तीन जिल्हे शाळा न्यायाधीकरण चंद्रपूर अधिकार क्षेत्रात आहेत. परंतु, चंद्रपूर शाळा न्यायाधीकरण बंद केल्यामुळे, विशेष करून गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना  त्याचा मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड वाढेल. शाळा न्यायाधीकरणात दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या समस्यांची संख्या वाढत आहे. त्यातही न्याय मिळण्यास बरेच वर्ष प्रकरण प्रलंबित राहत आहेत.  न्याय मिळेपर्यंत नागपूर सारख्या ठिकाणी जावे लागणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चंद्रपूर, गडचिराेली व वर्धा या तीन जिल्ह्यांतील माध्यमिक शिक्षकांना न्याय देण्यासाठी चंद्रपूर येथे शाळा न्यायाधीकरण आहे. मात्र, हे न्यायाधीकरण बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांना न्याय मागण्यासाठी नागपूरच्या न्यायाधीकरणात जावे लागणार आहे. नागपुरात जाऊन न्याय मागण्यासाठी शिक्षकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे.   महाराष्ट्र खासगी शाळा अटी व शर्ती अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ अंतर्गत खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सेवा मुक्त, बडतर्फ, पदानवत आणि सेवाज्येष्ठता डावलून दिलेल्या पदोन्नतीच्या आदेशांविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी शाळा न्यायाधीकरणाची स्थापना झालेली आहे. सन १९९८ मध्ये चंद्रपूर येथे अतिरिक्त शाळा न्यायाधीकरण सुरू केले. त्यावेळी चंद्रपूर शाळा न्यायाधीकरणात भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली असे एकूण पाच जिल्हे होते. त्यानंतर २००६-२००७ मध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचे अधिकार क्षेत्र चंद्रपूर येथून काढून, नागपूर शाळा न्यायाधीकरण येथे बहाल करण्यात आले. तेव्हापासून गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा हे तीन जिल्हे शाळा न्यायाधीकरण चंद्रपूर अधिकार क्षेत्रात आहेत.परंतु, चंद्रपूर शाळा न्यायाधीकरण बंद केल्यामुळे, विशेष करून गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना  त्याचा मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड वाढेल. शाळा न्यायाधीकरणात दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या समस्यांची संख्या वाढत आहे. त्यातही न्याय मिळण्यास बरेच वर्ष प्रकरण प्रलंबित राहत आहेत.  न्याय मिळेपर्यंत नागपूर सारख्या ठिकाणी जावे लागणार आहे. 

संस्थाचालक शिक्षकांची पिळवणूक करीत असल्याने शिक्षकांकडून दाखल तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. चंद्रपूर येथे २५ हजार रुपयांत वकील उपलब्ध हाेत हाेता. नागपुरात वकिलासाठी लाखाे रुपये माेजावे लागणार आहेत. तीन जिल्ह्यांसाठी चंद्रपुरात न्यायाधीकरण असूनही सात ते आठ वर्षांशिवाय शिक्षकांना न्याय मिळत नव्हता. आता किती वर्ष लागतील हे सांगणे अशक्य आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार व शिक्षक आमदार नागो गाणार यांनी चंद्रपूर न्यायाधीकरणासाठी प्रयत्न करावा. - संताेष सुरावार, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र