शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

न्यायासाठी माध्यमिक शिक्षकांना झिजवावे लागणार नागपूरचे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा हे तीन जिल्हे शाळा न्यायाधीकरण चंद्रपूर अधिकार क्षेत्रात आहेत. परंतु, चंद्रपूर शाळा न्यायाधीकरण बंद केल्यामुळे, विशेष करून गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना  त्याचा मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड वाढेल. शाळा न्यायाधीकरणात दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या समस्यांची संख्या वाढत आहे. त्यातही न्याय मिळण्यास बरेच वर्ष प्रकरण प्रलंबित राहत आहेत.  न्याय मिळेपर्यंत नागपूर सारख्या ठिकाणी जावे लागणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चंद्रपूर, गडचिराेली व वर्धा या तीन जिल्ह्यांतील माध्यमिक शिक्षकांना न्याय देण्यासाठी चंद्रपूर येथे शाळा न्यायाधीकरण आहे. मात्र, हे न्यायाधीकरण बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांना न्याय मागण्यासाठी नागपूरच्या न्यायाधीकरणात जावे लागणार आहे. नागपुरात जाऊन न्याय मागण्यासाठी शिक्षकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे.   महाराष्ट्र खासगी शाळा अटी व शर्ती अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ अंतर्गत खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सेवा मुक्त, बडतर्फ, पदानवत आणि सेवाज्येष्ठता डावलून दिलेल्या पदोन्नतीच्या आदेशांविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी शाळा न्यायाधीकरणाची स्थापना झालेली आहे. सन १९९८ मध्ये चंद्रपूर येथे अतिरिक्त शाळा न्यायाधीकरण सुरू केले. त्यावेळी चंद्रपूर शाळा न्यायाधीकरणात भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली असे एकूण पाच जिल्हे होते. त्यानंतर २००६-२००७ मध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचे अधिकार क्षेत्र चंद्रपूर येथून काढून, नागपूर शाळा न्यायाधीकरण येथे बहाल करण्यात आले. तेव्हापासून गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा हे तीन जिल्हे शाळा न्यायाधीकरण चंद्रपूर अधिकार क्षेत्रात आहेत.परंतु, चंद्रपूर शाळा न्यायाधीकरण बंद केल्यामुळे, विशेष करून गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना  त्याचा मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड वाढेल. शाळा न्यायाधीकरणात दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या समस्यांची संख्या वाढत आहे. त्यातही न्याय मिळण्यास बरेच वर्ष प्रकरण प्रलंबित राहत आहेत.  न्याय मिळेपर्यंत नागपूर सारख्या ठिकाणी जावे लागणार आहे. 

संस्थाचालक शिक्षकांची पिळवणूक करीत असल्याने शिक्षकांकडून दाखल तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. चंद्रपूर येथे २५ हजार रुपयांत वकील उपलब्ध हाेत हाेता. नागपुरात वकिलासाठी लाखाे रुपये माेजावे लागणार आहेत. तीन जिल्ह्यांसाठी चंद्रपुरात न्यायाधीकरण असूनही सात ते आठ वर्षांशिवाय शिक्षकांना न्याय मिळत नव्हता. आता किती वर्ष लागतील हे सांगणे अशक्य आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार व शिक्षक आमदार नागो गाणार यांनी चंद्रपूर न्यायाधीकरणासाठी प्रयत्न करावा. - संताेष सुरावार, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र