शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनातून आणले शाळकरी मुला-मुलींना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:51 IST

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : एरवी लग्न वऱ्हाड असो की कोणताही कार्यक्रम, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करताना कोणी दिसल्यास पोलीस त्यांना अडविल्याशिवाय राहात नाही. शनिवारी मात्र उलटेच चित्र गडचिरोलीत पहायला मिळाले. अहिंसा संदेश वाचनाच्या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी चक्क ट्रक, मिनी ट्रक, मेटॅडोअर अशा मालवाहू वाहनांमधून शाळकरी विद्यार्थ्यांना आणण्यात आले. एवढेच नाही तर काळी-पिवळी ...

ठळक मुद्देशिक्षक म्हणतात, पोलिसांनीच पाठविल्या गाड्या

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : एरवी लग्न वऱ्हाड असो की कोणताही कार्यक्रम, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करताना कोणी दिसल्यास पोलीस त्यांना अडविल्याशिवाय राहात नाही. शनिवारी मात्र उलटेच चित्र गडचिरोलीत पहायला मिळाले. अहिंसा संदेश वाचनाच्या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी चक्क ट्रक, मिनी ट्रक, मेटॅडोअर अशा मालवाहू वाहनांमधून शाळकरी विद्यार्थ्यांना आणण्यात आले. एवढेच नाही तर काळी-पिवळी जीप व इतर अनेक प्रवासी वाहनांमधून क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक संख्येने विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास घडविण्यात आला.तब्बल ७ हजार श्रोत्यांपैकी ९० टक्के श्रोते विद्यार्थीच होते. जिल्ह्याच्या बहुतांश भागातून शाळकरी, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला आणण्यासाठी पोलीस, सीआरपीएफची वाहने लावण्यात आली होती. पण ती मोजकीच असल्यामुळे ज्या शाळांकडे स्वत:च्या स्कूल बस आहेत त्यांनी त्या बसेसने विद्यार्थ्यांना आणावे असे ठरून त्यांच्या डिझेलचे पैसे पोलीस विभागाकडून देण्याचे ठरले. मात्र अनेक शाळांकडे स्कूल बसेसही नसल्यामुळे त्यांच्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था पोलीस विभागाने केली.प्राप्त माहितीनुसार, संबंधित पोलीस ठाण्यांना वाहनांची व्यवस्था करण्यास सांगितले होते. मात्र काही ठाण्यांनी चक्क आपल्या हद्दीत चालणाऱ्या काळी-पिवळी गाड्या, मालवाहू गाड्यांच्या मालकांना त्यांची वाहने विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्यासाठी भाड्याने मागितली. दुसरी वाहनेच उपलब्ध नसल्यामुळे नाईलाज म्हणून या वाहनांमधून विद्यार्थ्यांची व्यवस्था केल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात विद्यार्थ्यांसोबत आलेल्या काही शिक्षकांनी वाहनांबाबत विचारले असता, पोलिसांनी जी वाहने पाठविली त्या वाहनातून आम्ही आलो, ती वाहने आम्ही बुक केलेली नव्हती, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा पोलीस दलाकडे विचारणा केली असता आम्ही आमच्या स्तरावरून कोणत्याही शाळेला मालवाहू वाहने पाठविली नव्हती, असे सांगण्यात आले. त्यामुळे मालवाहू वाहने आली कुठून या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण झाले होते.श्रोत्यांना हवी होती संदेशाची प्रतआधीच बराच वेळ उन्हात ताटकळत बसलेले विद्यार्थी उन्हामुळे कासाविस झाले होते. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. त्यामुळे अहिंसा संदेशाचे वाचन जरी त्यांनी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला तरी त्यातीत मुद्दे त्यांच्या लक्षात राहतील का? याबद्दल मात्र शंका उपस्थित होत होती. संदेशाचे माईकवरून जाहीर वाचन करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना त्या संवादाची एक मुद्रित पत्र दिली असती तर किमान घरी जाऊनही त्यांना ते वाचन करून अहिंसेचे तत्व काय आहे हे समजून घेणे सोपे झाले असते, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांमध्ये उमटत होती.चार ते पाच तास ताटकळत राहिलेसकाळी जवळपास ९ वाजतापासून विद्यार्थी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर येण्यास सुरूवात झाली. मुख्य मैदानात येण्यापूर्वी त्यांच्यासाठी पोटभर मसाला भात आणि पिण्यासाठी भरपूर पाण्याचीही व्यवस्था केली होती. मात्र बारकोड लावून मुख्य मैदानात प्रवेश केल्यानंतर बाहेर निघता येत नव्हते. त्यामुळे दुपारी अडीच पर्यंत चार ते पाच तास त्यांना ताटकळत राहावे लागले.बारकोड रिडिंगमुळे नियोजन बिघडलेकार्यक्रमाला श्रोता म्हणून मैदानात उपस्थित राहणाºया प्रत्येक जणाची डिजीटल नोंद घेता यावी यासाठी प्रत्येकाच्या हातात बारकोड असलेला पट्टा घातला जात होता. मात्र तांत्रिक कारणामुळे बारकोडचे रिडिंग करण्यास कमालीचा विलंब लागत होता. दुपारी १२ पर्यंत अवघ्या १५०० जणांचा मैदानात प्रवेश झाला होता. अखेर बारकोड रिडींगच्या पद्धतीत थोडा बदल केल्यानंतर मग पटापट विद्यार्थ्यांना मैदानात प्रवेश मिळाला.