शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

दुर्गम भागातल्या आदिवासी महिलांच्या हिंमतीला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 10:14 AM

Gadchiroli news दुर्गम भागातील अनेक आदिवासी महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर नदीच्या वाहत्या पाण्यात नाव वल्हवत लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेऊन सोडतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्देदिवसभर नाव वल्हवून ‘त्या’ करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह

रमेश मारगोनवार

लोकमत न्यूज नेटवर्क

 गडचिरोली : शहरी भागातील एखादी महिला टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते तेव्हा तो कौतुकाचा विषय होतो; पण गडचिरोलीच्या दुर्गम भागातील अनेक आदिवासी महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर नदीच्या वाहत्या पाण्यात नाव वल्हवत लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेऊन सोडतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व टोकावरील भामरागड हे म्हणायला तालुका मुख्यालय असले तरी प्रत्यक्षात एखाद्या लहान गावासारखे आहे. तीन नद्यांच्या तीरावर वसलेल्या भामरागडपासून उत्तरेकडील गावांना जायचे असल्यास पामूलगौतम ही बारमाही वाहणारी नदी पार करावी लागते. पलीकडच्या जारेगुडा, गोलागुडा, दर्भा, दर्भाटोला, बोडंगे, इतलवार या पूर्णपणे आदिवासी लोकवस्तीच्या गावांना जाण्यासाठी नावेतून जाण्याशिवाय पर्याय नाही.

पैलतीरावरच्या गावकऱ्यांना रोजगार, दैनंदिन वस्तू, शेतीपयोगी साहित्य आणि इतर अनेक कामांसाठी भामरागडला यावे लागते. केवळ माणसेच नाही, तर त्यांचे विविध साहित्य, सायकली आणि मोटारसायकलीही छोट्या अरुंद नावेवर चढवून नदी पार केली जाते. ती नाव वल्हवत नदी पार करण्याचे जोखमीचे काम कोणतेही लाइफ जॅकेट न वापरता पुरुषांप्रमाणे गावातील महिलाही लीलया करतात.

दररोज एका कुटुंबाचा नंबर

रोजगाराची साधने मर्यादित असल्यामुळे दिवसभर नाव वल्हवून मिळणाऱ्या तोकड्या कमाईतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कोणतीही व्यावसायिक स्पर्धा न करता नदीच्या पलीकडील जारेगुडा या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे आळीपाळीने एक दिवस नाव वल्हवण्याची जबाबदारी येते. त्या दिवशीची कमाई त्या कुटुंबात जाते. बहुतांश कुटुंबांतील पुरुष आणि मुले मासेमारी करत असल्यामुळे पैलतीरावर प्रवासी नेणारी नाव वल्हवण्याची जबाबदारी महिलांवर येते.

पुलाची उभारणी केव्हा?

वर्षानुवर्षे याच पद्धतीने नावेचा वापर होत असल्यामुळे त्या गावातील लोकांना त्याची सवय झाली आहे; पण त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नदीवर पुलाची उभारणी करणे गरजेचे नाही का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या समस्येबद्दल ते आदिवासी कधी कुरबुर करत नाहीत आणि केली तरी त्यांचा आवाज प्रशासन, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाही.

टॅग्स :Womenमहिला