शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

दुर्गम भागातल्या आदिवासी महिलांच्या हिंमतीला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 10:15 IST

Gadchiroli news दुर्गम भागातील अनेक आदिवासी महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर नदीच्या वाहत्या पाण्यात नाव वल्हवत लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेऊन सोडतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्देदिवसभर नाव वल्हवून ‘त्या’ करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह

रमेश मारगोनवार

लोकमत न्यूज नेटवर्क

 गडचिरोली : शहरी भागातील एखादी महिला टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते तेव्हा तो कौतुकाचा विषय होतो; पण गडचिरोलीच्या दुर्गम भागातील अनेक आदिवासी महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर नदीच्या वाहत्या पाण्यात नाव वल्हवत लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेऊन सोडतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व टोकावरील भामरागड हे म्हणायला तालुका मुख्यालय असले तरी प्रत्यक्षात एखाद्या लहान गावासारखे आहे. तीन नद्यांच्या तीरावर वसलेल्या भामरागडपासून उत्तरेकडील गावांना जायचे असल्यास पामूलगौतम ही बारमाही वाहणारी नदी पार करावी लागते. पलीकडच्या जारेगुडा, गोलागुडा, दर्भा, दर्भाटोला, बोडंगे, इतलवार या पूर्णपणे आदिवासी लोकवस्तीच्या गावांना जाण्यासाठी नावेतून जाण्याशिवाय पर्याय नाही.

पैलतीरावरच्या गावकऱ्यांना रोजगार, दैनंदिन वस्तू, शेतीपयोगी साहित्य आणि इतर अनेक कामांसाठी भामरागडला यावे लागते. केवळ माणसेच नाही, तर त्यांचे विविध साहित्य, सायकली आणि मोटारसायकलीही छोट्या अरुंद नावेवर चढवून नदी पार केली जाते. ती नाव वल्हवत नदी पार करण्याचे जोखमीचे काम कोणतेही लाइफ जॅकेट न वापरता पुरुषांप्रमाणे गावातील महिलाही लीलया करतात.

दररोज एका कुटुंबाचा नंबर

रोजगाराची साधने मर्यादित असल्यामुळे दिवसभर नाव वल्हवून मिळणाऱ्या तोकड्या कमाईतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कोणतीही व्यावसायिक स्पर्धा न करता नदीच्या पलीकडील जारेगुडा या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे आळीपाळीने एक दिवस नाव वल्हवण्याची जबाबदारी येते. त्या दिवशीची कमाई त्या कुटुंबात जाते. बहुतांश कुटुंबांतील पुरुष आणि मुले मासेमारी करत असल्यामुळे पैलतीरावर प्रवासी नेणारी नाव वल्हवण्याची जबाबदारी महिलांवर येते.

पुलाची उभारणी केव्हा?

वर्षानुवर्षे याच पद्धतीने नावेचा वापर होत असल्यामुळे त्या गावातील लोकांना त्याची सवय झाली आहे; पण त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नदीवर पुलाची उभारणी करणे गरजेचे नाही का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या समस्येबद्दल ते आदिवासी कधी कुरबुर करत नाहीत आणि केली तरी त्यांचा आवाज प्रशासन, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाही.

टॅग्स :Womenमहिला