शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

दुर्गम भागातल्या आदिवासी महिलांच्या हिंमतीला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 10:15 IST

Gadchiroli news दुर्गम भागातील अनेक आदिवासी महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर नदीच्या वाहत्या पाण्यात नाव वल्हवत लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेऊन सोडतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्देदिवसभर नाव वल्हवून ‘त्या’ करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह

रमेश मारगोनवार

लोकमत न्यूज नेटवर्क

 गडचिरोली : शहरी भागातील एखादी महिला टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते तेव्हा तो कौतुकाचा विषय होतो; पण गडचिरोलीच्या दुर्गम भागातील अनेक आदिवासी महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर नदीच्या वाहत्या पाण्यात नाव वल्हवत लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेऊन सोडतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व टोकावरील भामरागड हे म्हणायला तालुका मुख्यालय असले तरी प्रत्यक्षात एखाद्या लहान गावासारखे आहे. तीन नद्यांच्या तीरावर वसलेल्या भामरागडपासून उत्तरेकडील गावांना जायचे असल्यास पामूलगौतम ही बारमाही वाहणारी नदी पार करावी लागते. पलीकडच्या जारेगुडा, गोलागुडा, दर्भा, दर्भाटोला, बोडंगे, इतलवार या पूर्णपणे आदिवासी लोकवस्तीच्या गावांना जाण्यासाठी नावेतून जाण्याशिवाय पर्याय नाही.

पैलतीरावरच्या गावकऱ्यांना रोजगार, दैनंदिन वस्तू, शेतीपयोगी साहित्य आणि इतर अनेक कामांसाठी भामरागडला यावे लागते. केवळ माणसेच नाही, तर त्यांचे विविध साहित्य, सायकली आणि मोटारसायकलीही छोट्या अरुंद नावेवर चढवून नदी पार केली जाते. ती नाव वल्हवत नदी पार करण्याचे जोखमीचे काम कोणतेही लाइफ जॅकेट न वापरता पुरुषांप्रमाणे गावातील महिलाही लीलया करतात.

दररोज एका कुटुंबाचा नंबर

रोजगाराची साधने मर्यादित असल्यामुळे दिवसभर नाव वल्हवून मिळणाऱ्या तोकड्या कमाईतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कोणतीही व्यावसायिक स्पर्धा न करता नदीच्या पलीकडील जारेगुडा या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे आळीपाळीने एक दिवस नाव वल्हवण्याची जबाबदारी येते. त्या दिवशीची कमाई त्या कुटुंबात जाते. बहुतांश कुटुंबांतील पुरुष आणि मुले मासेमारी करत असल्यामुळे पैलतीरावर प्रवासी नेणारी नाव वल्हवण्याची जबाबदारी महिलांवर येते.

पुलाची उभारणी केव्हा?

वर्षानुवर्षे याच पद्धतीने नावेचा वापर होत असल्यामुळे त्या गावातील लोकांना त्याची सवय झाली आहे; पण त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नदीवर पुलाची उभारणी करणे गरजेचे नाही का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या समस्येबद्दल ते आदिवासी कधी कुरबुर करत नाहीत आणि केली तरी त्यांचा आवाज प्रशासन, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाही.

टॅग्स :Womenमहिला